आशाताई बच्छाव
‘जनसेवा हिच ईश्वर सेवा’ समजुन कार्य करीत रहावे ः आ. गोरंट्याल
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) ः विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी समाजिक आणि राजकीय कार्य करत असतांना समाजसेवेचे व्रत डोळ्यासमोर ठेवून कार्य केल्यामुळे आपली मतदारसंघातील पकड अधिक घट्ट झाली आहे. आपण हि जनसेवा हिच ईश्वर सेवा समजुन कार्य करीत राहण्याचे आवाहन आ. कैलास गोरंटयाल यांनी केले.
आ. कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी रोजी जिल्हा महिला बाल रूग्णालय येथे रूग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी आ. गोरंट्याल बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदाताई पवार, शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव उगले यांनी आ. कैलास गोरंट्याल यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी आ. कैलास गोरंट्याल शहर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शेख महेमुद, युवानेते अक्षय गोरंट्याल यांच्याहस्ते रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी राम सावंत, नारायण वाढेकर, दिनकर घेवंदे, अब्दुल बासेत कुरैशी, राजेंद्र गोरे, अशोक उबाळे, ॲड. राम कुऱ्हाडे, मनोहर उघडे, धर्मा खिल्लारे, कलीम खान, शेख ईब्राहिम, शेख इर्शाद, आसिम बागवान, फकीरा वाघ, आनंद वाघमारे, गणेश वाघमारे, शिवप्रसाद चित्तळकर, प्रमोद अल्हाट, मोहन इंगळे, गणेश चांदोडे, सय्यद जावेद अली, योगेश पाटील, विभा लाखे, मथुराबाई सोळुंके, माणिक चव्हाण, शेख वसिम शेख नुरजहा, शेख अहेमद, अनसार कुरैशी, गोपाल चित्राल, दत्ता घुले आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.