आशाताई बच्छाव
. विशाल महाराज त्रिवेदी यांच्या मधुर वाणीतून भागवत कथेचे आयोजन
जालना /प्रतिनिधी दिलीप बोंडे
शहरातील गांधीनगर भागातील मल्लव गल्ली येथे दर वर्षी प्रमाणे या वर्षीही जय श्री हरी महिला मंडळ तर्फे पं. विशाल महाराज त्रिवेदी यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय भागवत कथा आजपासून सुरू झाली आहे.यनिमित्त कथेच्या प्रारंभी बालाजी नगर येथील बालाजी मंदिरातून कलश यात्रा काढण्यात आली असून ही यात्रा बालाजी मंदिर येथून रामनगर हनुमान मंदिर, ढोरपुरा, गांधीनगर, येथून मल्लाव गल्ली येथील कथेच्या स्थानी ही यात्रा संप्पन्न झाली.संगीतमय भागवत कथा ही आज दि.9 एप्रिल पासून सुरु झाली असून कथेची वेळ दररोज दुपारी 1 ते 4 राहणार आहे, सर्व तरी या कथेचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन या संगीतमय भागवत कथेच्या आयोजकानी केले आहे.कथेला आज पासून सुरवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी पं. विशाल महाराज त्रिवेदी यांनी या महात्म्याची महत्व समजून सांगितले. यावेळी या कलश यात्रेला व कथेला भाविक भक्तांची मोठी गर्दी होती.