आशाताई बच्छाव
फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध लावल्याने
फुले अंबडेकरी अनुयायांना सार्थ अभिमान ः अतुल सावे
जयंती उत्सव निमित्त शाहिर शितल साठे, सचिन माळी यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम गाजला
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) ः रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जगाच्या पाठिवर तेवत ठेवण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले यांनी महाराजांची समाधी शोधून काढली ही गौरवशाली घटना फुले आंबेडकरी अनुयायांना अभिमानास्पद असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी एका कार्यक्रमात सांगीतले.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने जुना जालना गांधी चमन येथील मंगळवार रोजी नवयान शाहिरी जलसा शाहिर शितल साठे, सचिन माळी (महापुरूषांच्या पोवाडयांचा) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री सावे अध्यक्षपदावरून बोलत होते. ते पुढे बोलतांना म्हणाले की, फुले दाम्पत्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातल्यामुळे आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले नाव लौकीक करतांना दिसत आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी फुले यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणे ही त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, फुले दाम्पत्यांच्या महान कार्यामुळे समाजातील विषमता दुर होवून समतेचे विचार सर्वदुर पसरले आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी राष्ट्रहित जोपासण्यासाठी समतेच्या विचारांचा अवलंब करावा असे आवाहन श्री दानवे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जयंती दिनानिमित्त महात्मा ज्योतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. आणि दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.