राजेंद्र पाटील राऊत
जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शेतकऱ्यांना अतिवृष्टीची पी एम किसान योजनेचे पैसे वेळेवर मिळेना= खातेदारांना एटीएम द्या
वैभव पाटील राजूरकर
मुखेड,(संग्राम पाटील वडजे तांदळीकर शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँक झाली पाहिजे गेल्या चार महिन्यापासून अतिवृष्टी व्यवहार झाली पण अल्फाबेट मुळे इंग्रजी वर्णमाला अनुसार वाटप सुरू झाले त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळेना त्यासाठी शेतकऱ्यांना एटीएम कार्ड द्यावीत अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष वैभव पाटील राजूरकर यांनी केली मुखेड जिल्हा मध्यवर्ती बँक ही मुख्य शाखा आहे तालुक्यातील सर्रास 32 गाव या शाखेला आहेत अतिवृष्टी ची रक्कम बँकेत जमा होते खाते ची संख्या जास्त आहे मात्र कर्मचारी कमी आहे अनेकदा सर्वर डाऊन चा प्रॉब्लेम येत असतो त्यामुळे वाटप प्रक्रियाही अतिशय ताटकळत बसावे लागते कधी ए पासून तर कधी झेड पासून उलट्या क्रमाने अनुदान वाटप केले जाते चार चार महिने वाटप सुरू असते त्यामुळे वेळेवर शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही शासनाच्या हेतू शेतकऱ्यांना वेळेवर मदत होत नाही यासाठी एटीएम द्यावेत जेणेकरून शेतकऱ्याची परशाने होणार नाही शिवाय वेळेवर अनुदान मिळेल अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील राजूरकर यांनी केले