Home नांदेड कुंटूर परीसरात पावसाचे थैमान, शेतीत पाणी साचल्याने आले तळ्याचे स्वरूप.

कुंटूर परीसरात पावसाचे थैमान, शेतीत पाणी साचल्याने आले तळ्याचे स्वरूप.

124

आशाताई बच्छाव

IMG-20220714-WA0005.jpg

कुंटूर परीसरात पावसाचे थैमान, शेतीत पाणी साचल्याने आले तळ्याचे स्वरूप.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
कुंटूर –
——————————-
नायगाव तालुक्यातील कुंटूर परीसरात गेली पाच दिवसापासून पावसाने तालुक्यात जोर धरला आसुन यात शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक कुंटूर गावाच्या पूलावरून पाणी जात आसल्याने तालुक्याचा संपर्क तुटला आहे तर गावातील नाल्या तुडुंब भरलेल्या वाहत आहेत .
नायगांव तालुक्यात पावसाने गेली पाच दिवसापासून चांगलाच जोर धरला आसुन पावसाचे पाणी आनेक शेतक-याच्या पिके आसलेल्या शेतात साचले आसुन आनेक शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे . पाऊस हा सतत चालु आसल्याने नागरीक घरातच आहे तर जनावरे गोटयातील खुटयालाच आसल्याने त्याच्या वैरणासाठी मालकाला मोठी कसरत करावी लागत आहे. , कुंटुर, देगाव, सांगवि, मेळगाव, धंनज, सातेगाव, इकळि, कोकलेगाव, मेळगाव, बळेगाव, रूई, शेळगाव, आनेक गावात या पावसाने थैमान घातले आहे .नदी, नाले, ओढे तुडंब भरून वाहत आहेत. या पावसाने शेतक-याचे मात्र मोठे नुकसान होत आहे .
पाच दिवसापासून सतत चालु असलेल्या पावसामुळे कामगाराच्या हाताला कामच नसल्याने त्याना मात्र आडचणीचा सामना करावा लागत आहे .शेतातील कामे बंद बांधकाम बंद , सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने कुंटूर ची बाजारपेठ ही ठप्प झाली आहे. पाच दिवसापासून कुंटूर च्या बाजारात शुकशुकाट पाहवयास मिळत आहे . कुंटूर चा संपर्क तुटला कुंटूर तांडा , कोकलेगाव , ईकळीमाळ, नायगाव कडे मार्गावरील पूलावरून पाणी जात आसल्याने वाहतूक ठप्प झाली आहे . आनेक गावातील मुख्य रस्त्यावरील पूलावरून पाणी जात आसल्याने आनेक गावचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे .
हजारो एकर जमिनीवर पाण्याखाली गेल्याने शेतक-या पुढे मोठे संकट उभे राहीले आहे . कुंटूर येथील तीन पुलावरून पाणी जात आसल्याने नागरिकांना रस्ता बंद झाला आहे . आनेक घरात पावसाचे पाणी जाऊन मोठे नुकसान झाले आहे . तालुक्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे .

Previous articleखामगावात सर्दी, ताप, डायरीयाचे रुग्ण वाढले.
Next articleओला दुष्काळ जाहीर करा:-महाराष्ट्र राज्य पदवधीर संघटनेची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.