आशाताई बच्छाव
ओला दुष्काळ जाहीर करा:-महाराष्ट्र राज्य पदवधीर संघटनेची मागणी
नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्यूज)
तालुक्यात सतत होत असलेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, राज्य शासनाने नायगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवधीर संघटनेचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
शेतकरी हतबल झाले आहेत. संपूर्ण तालुक्यातच अशी परिस्थिती आहे. तेव्हा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करुन ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवधीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश अनेराये यांनी केली आहे.
नायगाव तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. सहा दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही. पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून, पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दरम्यान, या मागणीचे निवेदन मेल द्वारे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.