आशाताई बच्छाव
ओबीसी समाजाच्या आर्थिक योजनेकडे
शासनाचे दुर्लक्ष ः कल्याण दळे
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः ओबीसी आर्थीक विकास महामंडळ आणि महाज्योती योजना राज्य शासन प्रभाविपणे राबवित नसल्यामुळे ओबीसी समाजातील सुशिक्षीत बेकारावर मोठा अन्याय होत असून सदरील महामंडळांना वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ओबीसी व्हिजेएनटी बहुजन विकास परिषदेचे कार्याध्यक्ष कल्याण दळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
ओबीसी विकास महामंडळाच्या विविध योजना असतांना देखील ओबीसी समाजाच्या लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही. शासनाने या महामंडळाला वाढीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतू प्रत्येक्षात मात्र हा निधी देण्यात आलेला नाही. शासनाच्या महाज्योतीच्या योजना देखील तत्परतेने अंमलबजावणी होत नाही. शासनाने याकडे देखील जाणून बुजून कानाडोळा केलेला आहे अशी टिका परिषदेचे नेते श्री दळे यांनी पत्रकात नमूद केली आहे. वाढती बेरोजगारी पहाता शासनाने केंद्र शासनाच्या मुद्रा लोन गरजवंतांना न देता भाजपाच्या कार्यकर्त्यांना वितरीत करण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे समाजातील गरजू आणि होतकरू बेकारांना याचा लाभ मिळू शकला नाही. यामुळे खऱ्या गरजूवंतांना या योजनेपासून वंचित राहावे लागले असल्याची खंत श्री दळे यांनी व्यक्त केली आहे. शासनाच्या कौशल्य विकास योजनेचे देखील तीन-तेरा वाजलेले असल्याचे दिसून येत आहे. या योजनेच्या देखील अनेक तक्रारी असतांना शासनाने याबाबीकडे गंभीरतेने बघीतलेले नाही. यामुळे बारा बलुतेदार समाजावर अन्याय झालेला आहे. शासनाने हा अन्याय त्वरीत दुर करावा अशी मागणी श्री दळे यांनी केली आहे. एकुणच केंद्र आणि राज्य शासनाच्या ओबीसी समाजाच्या संदर्भातील योजना ह्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या आहेत. यामुळे ओबीसी समाजामध्ये आणि विशेष करून