Yuva maratha news
परोपकाराचे प्रत्यक्ष स्वरूप दर्शववणारा मानव एकता दिवस
मनुष्य जीवन परोपकारासाठी समर्पित व्हावे- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: निराकार प्रभुने आम्हाला हे जे मानव जीवन दिले आहे त्याचा प्रत्येक क्षण मानवतेसाठी समर्पित व्हावा, असा परोपकाराचा सुुंदर भाव आपल्या हृदयात उत्पन्ि होतो तेव्हा खरुं तर अवघी मानवता आम्हाला आपली वाटू लागते. असे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी मरानव एकता दिवस प्रसंगी भाविक भक्तगणांना संबोधित करतांना व्यक्त केले.
मानव एकता दिवसाच्या पावन पर्वावर गांधी चमन जवळील रेल्वे स्टेशन रोडवरील संत निरंकारी सत्संग भवनात मानव एकता दिवसानिमित्त विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले होते. बाबा गरुबचतनसिंहजी यांनी मानलवतेच्या प्रति केलेल्या महान सेवांसाठी समर्पित असून त्यातून प्रेरणा घेऊन निरंकारी जगतातातील प्रत्येक भक्त आपल्या जीवनाचे कल्याण करत आहे.
संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिेबल फाऊंडेशनच्यावतीने संपूरॅ भारत वर्षात जवळपास 207 ठिकाणी विशाल रुपात रक्तदान शिबिरांच्या श्रृखलेचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये सुमारे 50,000 युनिट रक्त संकलीत करण्यात आले. त्यामध्ये दिल्लतील ग्राऊंड न. 02 निरंकारी चौक, बुराडी येथे आयोजित रक्तदान शिबिरात समस्त रक्तदात्यांनी स्वेच्छेने व अत्यंत उत्साहाने साधारणत: 1500 युनिट रक्तदान केले. या प्रसंगी निरंकारी राजपिता रमितजी यांनीही रक्तदान केले. जे मिशनच्या भक्तांसाठी व युवा सेवादारांसाठी नि:संशयपणे एक प्रेरास्त्रोत बनले. या सर्व रक्तादन शिबीरांमध्ये रक्तादानापूर्वी आवश्यक असलेल्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. तसेच स्वच्छतेतेची विशेष काळजी घेण्यात आली. रक्तदानात्यांसाठी उत्तमप्रकारे अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती.