आशाताई बच्छाव
समृद्धीने दूर केली मासेगांवची पाणी टंचाई
सतीश घाटगे यांनी सुरु केल मोफत टँकर
———-
घनसावंगी/जालना ,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): हंडाभर पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या घनसावंगी तालुक्यातील मासेगावच्या हजारो कुटुंबांच्या पाण्याचा प्रश्न समृद्धी साखर कारखान्याने सोडवला आहे. समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी मोफत टँकर सुरु करून गावाची तहान भागवली. याबद्दल मासेगांवच्या महिलांनी सतीश घाटगे यांचे आभार मानले.
दुष्काळाने होरपळलेल्या घनसावंगी मतदारसंघातील टंचाईग्रस्त गावांना समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्यावतीने मोफत टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक गावांना समृद्धीच्या टँकरने दिलासा दिला आहे. घनसावंगी तालुक्यातील मासेगांवातही पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. गंगाधर आनंदे यांनी गावकऱ्यांच्या वतीने त्यांना पाणी टँकर सुरु करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन शुक्रवारी सतीश घाटगे यांनी टँकर सुरु केले. समृध्दी कारखान्याच्या माध्यमातून टँकर सुरु करून पाण्यासाठी महिलांची होत असलेली हेळसांड थांबवल्याबद्दल गावकऱ्यांनी समृद्धी कारखान्याचे आभार मानले. कारखान्यामार्फत मासेगावात आलेल्या पाण्याच्या टँकरचे रामायणाचार्य लक्ष्मण महाराज आनंदे, भाजपा तालुका उपाध्यक्ष सतीश आनंदे,चेअरमन प्रकाशराव आनंदे, सरपंच बाबुराव पुरी, भाजपा तालुका सरचिटणीस अमोल आनंदे,दत्ताभाऊ आनंदे, जेष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव आनंदे, बापुराव घुमरे, ग्रां.प.सदस्य हनुमंत आनंदे, दामोधर आनंदे, महेश आनंदे, आसाराम आनंदे, दत्ताभाऊ शिंदे, आसाराम आनंदे, श्रीहरी आनंदे, कल्याण आनंदे, सिध्देश्वर आनंदे, एकनाथ आनंदे, सुनील कोळे, गणेश आनंदे आदींच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.