राजेंद्र पाटील राऊत
भंडारा येथील नवजात शिशू दुर्घटना : आग प्रकरणी सुरू केलेली चौकशी नि:पक्षपणे होईल असा विश्वास वाटतो – ना.डॅा.नीलम गोऱ्हे, महाराष्ट्र विधानपरिषद,उपसभापती
(सिध्दांत चौधरी/विलास पवार युवा मराठा न्युज नेटवर्क)
दि.११ पुणे:- भंडारा मधील नवजात शिशुंचा झालेला अंत हा अत्यंत दुःखदायक, क्लेशदायक आणि अस्वस्थ करणारा आहे. या दुर्दैवी घटने मध्ये जे जबाबदार असतील,ज्यांनी हलगर्जीपणा केला असेल किंवा काही तांत्रिक प्रश्न झाला असेल त्याच्या चौकशीचे आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेले आहे. माननीय मुख्यमंत्री आज भंडारा येथील शासकीय रुग्णालय येथे गेलेले होते. त्यांनी या संपूर्ण घटनेची चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी योग्य पद्धतीने नक्की होईल.
या घटनेमध्ये गेलेल्या लहान जीवांची भरपाई कशानेही होत नाही ही वस्तुस्थिती आहे. या परिस्थितीत कोणीही टीका करू नये. तरीही होणाऱ्या टीकेवर बोलायचे तर महापुरामध्ये सांगलीला अनेक जणांनी पुराच्या पाण्यात स्वतःच उड्या मारून, पोहून,त्याचेच फोटोशूट करण्याची संवेदनहीनता दाखवली होती. अशा राजकीय व्यक्तींनी याबद्दल काही टीका करून राजकारण केले तर मला असं वाटते की जनताच ह्या राजकीय टीकेला नक्कीच योग्य पद्धतीने उत्तर देईल .
कोरोनाामुळे सगळेच मोठ्या जबाबदारीत होते व आपल्या आरोग्य यंत्रणा वर प्रचंड भार होता अशा वेळेला काही डॉक्टर्स, नर्सेस, अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःचे जीव गमावलेले आहेत. सरकार या घटनेची चौकशी योग्य व नि:पक्षपणेच करेल याबद्दल सर्वांनी विश्वास ठेवावा.
मला असं वाटते की ज्याच्यावर हा दुःखद प्रसंग ओढवला आहे त्या कुटुंबियांची उद्धवजींची आजची भेट उपयुक्त ठरेल व या कुटुंबियांना नक्कीच या दुःखातून सावरण्यासाठी शासन त्यांच्याबरोबर आहे हा विश्वास मिळाला असेल. राज्यातील सर्व हॉस्पिटल व्यवस्थापकना मला सुचवावेसे वाटते की रुग्णाबरोबर हॉस्पिटलमध्ये 2-3 पालकांना कक्षाच्या बाहेर बसण्याची परवानगी द्यावी. यामध्ये संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. ह्या पालकांची काही वेळा आपत्तीच्या प्रसंगात मदत होईल.