आशाताई बच्छाव
मराठी राजभाषा दिन
संस्कार प्रबोधिनीत रंगली प्रकट मुलाखत
:विद्यार्थी बनले पत्रकार
जालना, दि. २७ (प्रतिनिधी दिलीप बोंडे) -कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मंगळवारी
जालन्यातील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन
म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त संस्कृती सातपुते,धनश्री शिंदे,
तेजश्री वाघ,साक्षी डोंगरे, कार्तिकी सरडे,वैष्णवी सोनटक्के,प्रणव
डोईफोडे, जितेश सोनटक्के या विद्यार्थ्यांनी जालन्यातील कवी डॉ.गोपाळ
विठोबा तुपकर यांची प्रकट मुलाखत घेतली.
यावेळी कवींनी स्वतःला आलेल्या अनुभवाचे थोडक्यात विवेचन करून कवितेची
महती विद्यार्थ्यांना उलगडून सांगितली.कविते संदर्भात आपल्याला काय
वाटते? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारल्यानंतर डॉ.गोपाळ तुपकर
म्हणाले. शब्दांचा संचय असला तरच तुमची कविता व्यक्त होत असते. आई आणि
भाषेची सांगड तुम्ही कशी घालतात?असे विचारले असता डॉ.तुपकर म्हणाले आई
आणि मातृभाषा ही सर्वांनाच प्रिय असते कवितेतून कवी नेहमी व्यक्त होत
असतो असे सांगून विद्यार्थ्यांनी आपला छंद विकसित केला पाहिजे म्हणजे
यशस्वी होता येते,असे सांगून त्यांनी विविध उदाहरणे देऊन यशाचा मूलमंत्र
सांगताना त्यांनी माणूस माणसाला शोधतो कुठे ही कविता सादर केली.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी एकाग्रता
महत्त्वाची आहे. एकाग्रतेतून माणूस समृद्ध होत जातो,आणि मग तो यशाला
गवसणी घालतो असे डॉ. तुपकर म्हणाले.यानंतर संस्कार प्रबोधिनी
विद्यालयातील प्रणव डोईफोडे व निकिता जाधव या विद्यार्थ्यांनी आपल्या
कविता सादर केल्या.व इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध कवयित्री
संत जनाबाईंच्या जात्या वरील ओव्या गायल्या. मराठी राजभाषा दिनाचे आयोजन
मराठीचे शिक्षक रामदास कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले
होते.