आशाताई बच्छाव
ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रती सतीश घाटगे यांची कृतज्ञता : शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी घरपोच आली ‘समृद्धी’ची साखर
घनसावंगी / अंबड जालना ,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): समृध्दी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी कन्यादान योजना सुरु केलेली आहे. या योजनेअंतर्गत अंबड- घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव, वडीकाळ्या व तीर्थपुरी येथील शेतकऱ्यांना सतीश घाटगे यांच्या माध्यमातून घरपोच एक क्विंटल साखर देण्यात आली.
उस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी भाव देण्याबरोबरच त्यांच्यासाठी हिताचे ठरणारे सामाजिक उपक्रम समृध्दी साखर कारखाना राबवतो. कारखान्याच्या सामाजिक उपक्रमाचा एक भाग असलेली कन्यादान योजना आहे. या योजनेअंतर्गत कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना मुलीच्या लग्नासाठी
एक क्विंटल साखर मोफत घरपोच देण्यात आली. सतीश घाटगे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या योजनेमुळे ऊस उत्पादक शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत. देवी दहेगाव येथील समृध्दी साखर कारखान्याचे दिवंगत सभासद कै.गंगाधरराव रामप्रसाद शिंदे, तिर्थपुरी येथील सभासद विनायक माणिकराव चिमणे व अंबड तालुक्यातील वडीकाळ्या येथील सभासद शेतकरी कचरू आसाराम शहाणे यांना मुलीच्या लग्नासाठी कारखाना प्रशासनाने घरपोच साखर नेऊन दिली. यावेळी सभासद शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत सतीश घाटगे व महेंद्र मेठी यांचे आभार मानले. यावेळी कारखान्याचे संचलक विकास शिंदे, कर्मचारी जावेद शेख व गावकरी उपस्थित होते.
—————–