आशाताई बच्छाव
जालन्यातील चार धावपटूंनी लोणावळा येथील टाटा अल्ट्रा मॅरेथॉन 50 किलो मीटर पूर्ण केली!
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): 27 फेब्रुवारी रविवारच्या दिवशी लोणावळा येथे टाटा ग्रुपने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अल्ट्रा मॅरेथॉन पस्तीस व पन्नास कि. मी. ंंठेवली होती. या स्पर्धेत दोन गट ठेवण्यात आले होते. एक गट 45 पर्यंतच्या महिला व पुरुषांसाठी तर दुसरा गट हा पंचेचाळीस वर्षाहून अधिकांसाठी होता. या स्पर्धेत देशभरातून पुरुष व महिला धावपटूंनी हजारोच्या संख्येने या स्पर्धेत भाग घेतला होता. हि स्पर्धा 800 मीटर चढाईची असते. जगंल आणि डोंगराच्या वाटा मधून जाते. चढ आणि उतार अत्यंत कठीण असल्याने ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक धावपटूंना एक मोठी कसरत करावी लागते.
जालन्यातील जितेंद्र अग्रवाल, संजय अंपळकर, मिलींद खेरुडकर व राजू सैनी या चार धावपटूंनी ही कठीण स्पर्धा केली. ही स्पर्धा पूर्ण करतांना सर्वांना वेगवेगळा अनुभवही आला. कारण ही स्पर्धा पूर्ण करतांना इतक्या उंच व लगेचच खाली उतारावर धावणे हे सर्वांनासाठी कठीण कार्य होते. रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी पहिल्यांदाच असे पळण्याचा अनुभव आला. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ही स्पर्धा सुुरु होती व भाग घेतलेल्या सर्वच धावपटूंनी पूर्ण केली. इतक्या कठीण स्पर्धेत सुध्दा आम्हाला 70- 75 वर्षापर्यंतचे महिला व पुरुष धावपटू पळतांना दिसले. ज्याच्यामुळे आम्हाला खूप मोठे प्रोत्साहन मिळाले.
पन्नास कि. मी.ची अल्ट्रा मॅरेथॉन जितेंद्र अग्रवाल यांनी केवळ पाच तास 33 मिनिटात पूर्ण केली तर राजू सैनी यांनी सहा तास 54 मिनिटात तर संजय अंपळकर आणि मिलींद खेरुडकर या दोघांनी सात तासात सोबतच पूर्ण केली. त्यांच्या या यशाबद्दल जालन्याच्या फॅब रनर्स ग्रुप व इतर खेळ प्रेमींनी अभिनंदन केले आहे.