आशाताई बच्छाव
जूलूसमध्ये आक्षेपार्ह घोषणाबाजी करणाऱ्या खंडव्याच्या हाश्मी गृपच्या पदाधिकाऱ्यंावर कारवाईची मागणी
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – खंडवा (मध्यप्रदेश) येथे मुस्लीम बांधवांच्या वतीने ईद मिलादची रॅली (जुलूस) काढण्यात आली होती. या रॅलीत हाश्मी गृपच्या पदाधिकाऱ्यंानी आक्षेपार्ह घोषणाबाजी करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या कृत्यास चालना देवून राष्ट्रीय एकात्मता आणि सार्वजनिक शांततेला धोका पोहचण्याचे काम केले आहे. या कृत्याचा चाळीसगाव येथील मुस्लीम बांधवांनी तीव्र निषेध केला असून हाश्मी गृपच्या पदाधिकाऱ्यंावर कारवाई करावी अशी मागणी चाळीसगाव शहर पोलीसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात असगर सैय्यद महेबूब यांच्यासह समाजबंाधवांनी दिेलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 29 सप्टेंबर रोजी इस्लाम धर्माचे शेवटचे पैंगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा सलल्लाहू अलैही वसल्लम यांच्या जन्मदिनानिमीत्त खंडवा येथे धार्मीक रॅली काढण्यात आली.त्यात हाश्मी गृपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इस्लाम धर्मीय समर्थक सामील झाले होते. ही रॅली रस्त्याने जात असतांना हाश्मी गृपच्या काही सदस्यंानी सार्वजनिक शांतता बिघडावी म्हणून आक्षेपार्ह घोषणाबाजी केली.त्यामुळे मुस्लीम समाजात संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या रॅलीत लहान मुलांना आपत्तीजनक घोषणा शिकवणारे व त्यांना घोषणा देण्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर असगर सैय्यद, तन्वीर शेख, सोनू शाह, सलीम सैय्यद, अजमल खान, अफरोज खान, इद्रीस शाह, अजमल खान, फिरोज जहागिरदार, शरीफ मिर्झा यांच्या सहया आहेत.निवेदन पोलीस अधीक्षक जळगाव, अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव व सहाय्यक पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांना पाठवण्यात आले आहे