आशाताई बच्छाव
जळगाव जिल्ह्यातून हमालीसाठी आलेल्या युवकाची सप्तश्रुंगी गडावर गळफास घेऊन आत्महत्या
कळवण,(प्रतिनिधी बाळासाहेब निकम)
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातल्या सप्तश्रुंगी गडावर जळगाव
जिल्ह्यातून हमाली कामासाठी आलेल्या एका तरुणाने घराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी वरच्या मजल्यावर दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संतोष माधव भावसार (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच या घटनेची नोंद कळवण पोलिसांत करण्यात आली आहे, याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष भावसार हा सप्तशृंगी गडावर हमाली काम करून उदरनिर्वाह करत होता. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घरमालक बापू मोरे यांनी का ठिकाणी पाणी मारण्यासाठी पाण्याची मोटर सुरु केली. त्यावेळी प्लास्टिकच्या पाईपमध्ये पाणी येत नसल्याने ते बांधकाम ठिकाणच्या चौथ्या मजल्यावर बघण्यासाठी गेले असता त्यांना मयत संतोष उर्फ (भंभ्या) भावसार दोरीच्या साह्याने तसेच पाण्याच्या पाईप नळीत गुंतल्याचे दिसून आले आहे, यानंतर कळवण पोलीस ठाणे अंतर्गत नांदुरी पोलीस दूरक्षेत्रातील पोलिसांना बांधकाम मालक यांनी कळविले असता पोलिसांनी मयत भावसार याच्या आधारकार्डची चौकशी करत त्याच्या कुटुंबियांना संपर्क करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
त्यानंतर डॉक्टरांच्या अहवालनुसार भावसार याचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असता पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच याप्रकरणाचा पुढील तपास कळवण पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कुलकर्णी, पोलीस नाईक निलेश शेवाळे, संदीप बत्तीसे, नितीन देवरे हे करत आहेत