आशाताई बच्छाव
शिवसेना दलित आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
रणरणत्या उन्हात भुमिहिन कास्तकरांची मोठी उपस्थिती
जिल्हाधिकार्यांमार्फत राज्यपालांना निवेदन
जालना, (दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-मराठवाड्यातील विशेषता जालना जिल्हातील दलित
आदिवासी भूमिहीन कास्टकरांचे शेतीसाठी झालेले शासकीय पड जमिनी वरील
अतिक्रमण नियमानुकुलीत करून सातबारा उतार्याला नावे घेण्यात यावा या
मागणीसाठी १२ जून रोजी जालना येथील अंबड चौफुली ते शासकीय विश्रामगृह
धडक मोर्चा आणि मागच्या संदर्भात जिल्हाधिकारी मार्फत राज्यपालांना
शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्करराव मगरे यांच्या
नेतृत्वात शिष्टमंडळाने निवेदन दिले. दरम्यान भर उन्हात भुमिहिन कास्तकर
मोठ्या संख्येने या विराट मोर्चा सहभागी झाले होते. यावेळी सातबारा
आमच्या हक्का.. सातबारा द्या..सातबारा द्या… अशा घोषणा यावेळी
उपस्थितांनी दिल्या. या विराट मोर्चात जिल्ह्यातील कोना-कोपर्यातून
मोर्चेकरी सहभागी झाले होते.
शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्करराव मगरे यांच्या
उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी देण्यात
आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठवाड्यातील दलित आदिवासी भूमीहीन
कास्ट पट्टे व स्थानिक दलित आदिवासी भूमिहीन लाभार्थ्यांना शासनाने
प्रदान केलेल्या शेतजमिनी उदाहरणार्थ उदा. सिलिंग अॅक्ट मधील शासकीय
गायरान जमिनी, इनामी जमिनी इत्यादी संगणकीय सातबारा वरून लाभार्थ्याचे
नाव समोरील क्षेत्र पोट खराबी मध्ये दाखवत असल्याने शासकीय योजनेचा लाभ
आणि बँकेचे कर्ज मिळत नसल्यामुळे लाभार्थी क्षेत्र दुरुस्ती करून पूर्वत
करण्यात यावे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेची
प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.