आशाताई बच्छाव
ग्रामपंचायत सरपंचाने स्वतः पेक्षा गावकऱ्यांना महत्व द्यावे:- स्वप्निल देशमुख राष्ट्रीय अध्यक्ष युवा मराठा महासंघ
वानखेड : “सरपंच” हा गावकऱ्यानी निवडून दिलेला गावकर्याचा “ग्रामसेवक”असतो. आणि गावकऱ्याची सेवा करणे, गावकरी मंडळींचा “मानसन्मान” करणे हे त्याचे आद्य कर्तव्य असते
आपल्या गावातील एखादा विद्यार्थी विद्यार्थीनी गुणवंत म्हणून नावारूपाला येत असेल तर त्याचे कौतुक करून त्याला प्रोत्साहन देणे. गावातील एखादी व्यक्ती साहसी कार्य करून गावाचे नाव उज्वल करीत असेल, देशाची सेवा करीत असतांना सेवानिवृत्त झालेला असेल तर त्या सेवानिवृत्त व्यक्तीचा मानसन्मान करणे. प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन अशा दिवसाला, स्वतःमधील “मी”पणा किंवा अहंकार बाजूला ठेवून,गावकरी मंडळीचा आदर सत्कार करणे हे “सरपंच” रूपी “ग्रामसेवकाचे” कर्तव्य असते
केन्द्रशासन तथा राज्य शासनाकडून जिल्हा परिषदे मार्फत पंचायत राज योजना, ग्रामविकास योजने मधून जास्तित जास्त विकास निधी मिळवून गावकर्यासाठी पिण्याच्या पाण्याची पाणी पुरवठा, स्ट्रिट लाईट व्यवस्था, रस्त्याचे निर्माण व पुनर्रचना, सांडपाण्याची व्यवस्था, खेड्यातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची व्यवस्था, प्रधानमंत्री आवास योजना, कृषी विकास योजना,ग्रामविकास योजना, शिक्षण योजना इत्यादी योजना सुयोग्य पणे राबवून आपल्या गावाचा विकास करणे. हे सुयोग्य व चांगल्या सरपंचाची कृत्य असतात. आपल्या गावातील वादविवाद मिटवून आपल्या खेडेगावाला तंटामुक्त गाव ठेवण्याची जबाबदारी ज्या गावप्रमुख सरपंचावर असते त्या सरपंचानेच गावकऱ्याना मानसन्मान दिला नाही. तर येथील बहुजन मतदार तुम्हाला ग्रामपंचायत सोडून द्यायला गावकरी मजबूर करू शकतात. नव्हे नव्हे पुढील निवडणूकीत तुम्हाला तुमच्या घरी परत पाठवू शकतात. अन्याय अत्याचाराला कंटाळून मोठमोठ्या राजा महाराजांना जनतेला घाबरून संस्थाने सोडून पळ काढावा लागला होता. एवढेच नव्हे तर वर्तमान चालू वर्षात श्रीलंकेच्या राष्ट्रपती पंतप्रधान यांना सुद्धा नागरीकांच्या रोषामुळे पळ काढावा लागला. हे सरपंचांनी लक्ष्यात घ्यायला हवे. व तुम्हाला सरपंच पदी बसविणाऱ्या, किंगमेकर्स नागरिकांचे उपकार मानून त्यांचे सेवा सुविधा, मान सन्माना करीता तत्पर रहायला हवे.