Home बुलढाणा ग्रामपंचायत सरपंचाने स्वतः पेक्षा गावकऱ्यांना महत्व द्यावे:- स्वप्निल देशमुख राष्ट्रीय अध्यक्ष युवा...

ग्रामपंचायत सरपंचाने स्वतः पेक्षा गावकऱ्यांना महत्व द्यावे:- स्वप्निल देशमुख राष्ट्रीय अध्यक्ष युवा मराठा महासंघ

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20231203-WA0210.jpg

ग्रामपंचायत सरपंचाने स्वतः पेक्षा गावकऱ्यांना महत्व द्यावे:- स्वप्निल देशमुख राष्ट्रीय अध्यक्ष युवा मराठा महासंघ
वानखेड : “सरपंच” हा गावकऱ्यानी निवडून दिलेला गावकर्‍याचा “ग्रामसेवक”असतो. आणि गावकऱ्याची सेवा करणे, गावकरी मंडळींचा “मानसन्मान” करणे हे त्याचे आद्य कर्तव्य असते
आपल्या गावातील एखादा विद्यार्थी विद्यार्थीनी गुणवंत म्हणून नावारूपाला येत असेल तर त्याचे कौतुक करून त्याला प्रोत्साहन देणे. गावातील एखादी व्यक्ती साहसी कार्य करून गावाचे नाव उज्वल करीत असेल, देशाची सेवा करीत असतांना सेवानिवृत्त झालेला असेल तर त्या सेवानिवृत्त व्यक्तीचा मानसन्मान करणे. प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन अशा दिवसाला, स्वतःमधील “मी”पणा किंवा अहंकार बाजूला ठेवून,गावकरी मंडळीचा आदर सत्कार करणे हे “सरपंच” रूपी “ग्रामसेवकाचे” कर्तव्य असते
केन्द्रशासन तथा राज्य शासनाकडून जिल्हा परिषदे मार्फत पंचायत राज योजना, ग्रामविकास योजने मधून जास्तित जास्त विकास निधी मिळवून गावकर्‍यासाठी पिण्याच्या पाण्याची पाणी पुरवठा, स्ट्रिट लाईट व्यवस्था, रस्त्याचे निर्माण व पुनर्रचना, सांडपाण्याची व्यवस्था, खेड्यातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची व्यवस्था, प्रधानमंत्री आवास योजना, कृषी विकास योजना,ग्रामविकास योजना, शिक्षण योजना इत्यादी योजना सुयोग्य पणे राबवून आपल्या गावाचा विकास करणे. हे सुयोग्य व चांगल्या सरपंचाची कृत्य असतात. आपल्या गावातील वादविवाद मिटवून आपल्या खेडेगावाला तंटामुक्त गाव ठेवण्याची जबाबदारी ज्या गावप्रमुख सरपंचावर असते त्या सरपंचानेच गावकऱ्याना मानसन्मान दिला नाही. तर येथील बहुजन मतदार तुम्हाला ग्रामपंचायत सोडून द्यायला गावकरी मजबूर करू शकतात. नव्हे नव्हे पुढील निवडणूकीत तुम्हाला तुमच्या घरी परत पाठवू शकतात. अन्याय अत्याचाराला कंटाळून मोठमोठ्या राजा महाराजांना जनतेला घाबरून संस्थाने सोडून पळ काढावा लागला होता. एवढेच नव्हे तर वर्तमान चालू वर्षात श्रीलंकेच्या राष्ट्रपती पंतप्रधान यांना सुद्धा नागरीकांच्या रोषामुळे पळ काढावा लागला. हे सरपंचांनी लक्ष्यात घ्यायला हवे. व तुम्हाला सरपंच पदी बसविणाऱ्या, किंगमेकर्स नागरिकांचे उपकार मानून त्यांचे सेवा सुविधा, मान सन्माना करीता तत्पर रहायला हवे.

Previous articleकरडखेड येथे महर्षी राजा भगीरथची जयंती
Next articleराष्ट्रवादी क्रांग्रेस लोहा तालुका अध्यक्ष पदी छत्रपती स्वामी यांची निवड !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here