आशाताई बच्छाव
तळेगावच्या विधवा, निराधार महिलेला मिळाला हक्काचा निवारा
लोकविकास व अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाने पुर्ण केला संकल्प. (फोटो)
मयुर खापरे चादुंर बाजार-– तालुक्यातील तळेगाव मोहना निवासी वैशाली संजय नवलकर या विधवा,निराधार महिलेच्या घराची परिस्थिती अत्यंत शिकस्त होती ते केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत होते.पतीच्या गेल्यानंतर दोन लेकराचे पालन-पोषण करण्यासोबत आपला जीव मुठीत घेऊन आपल्या लेकरा सह या पडक्या घरात आपले जीवन जगत होती.घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने कुटुंबाच्या उपजिविके सोबत घराचे बांधकाम करणे वैशालीला शक्य नव्हते.अशातच वैशालीची करुण कहानी लोकविकास संघटनेच्या गोपाल भालेराव व रमण लंगोटे यांना अवगत करण्यात आली.त्यांनी अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे प्रसिध्दीप्रमुख सागर सवळे यांना दिली.सर्वांनी वैशालीला पक्का निवारा बांधून देण्याचा संकल्प करुन चांदूरबाजार शहरासह तालुक्यातील दानदात्यांच्या आर्थिक सहकार्यातुन वैशालीला पक्के घर बांधून दिले.या नविन घराचे लोकार्पण भाऊबिजेच्या पर्वावर नुकतेच करण्यात आले.यात गो.सी.टोम्पे महाविद्यालयाचे अध्यक्ष भाष्कर टोम्पे,जगदंब इंग्लीश स्कुलचे अध्यक्ष विनोद कोरडे,सामाजिक कार्यकर्ता मनोज कटारीयासह अनेक दानदात्यांनी आर्थिक सहकार्य करुन मोलाचे सहकार्य केले.लोकविकास संघटना,अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ यांचा पुढाकार व परिश्रम व दानदात्यांचे सहकार्या यामुळे आज निराधार,विधवा वैशाली व त्यांच्या मुलांना हक्काचे पक्के घर मिळाले.हा या संघटनेचा दुसरा सेवा उपक्रम आहे.गेल्यावर्षी दिलालपुर येथील विधवा, निराधार दिव्यांगना डोंगरे या वृध्द महिलेला पक्के घर बांधून दिले आहे.
रविवारी दुपारी ४ वाजता तळेगाव मोहना येथे वैशालीचा आपल्या मुलांसह नविन घरात गृहप्रवेश झाला.यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात लोकविकास संघटनेचे अध्यक्ष गोपाल भालेराव,संघटक रमण लंगोटे,अ.भा.ग्रामिण पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर सुने,सरचिटणीस सुरेश सवळे,प्रसिध्दी प्रमुख सागर सवळे,जगदंब स्कुलचे अध्यक्ष विनोद कोरडे,सामाजिक कार्यकर्ता मनोज कटारीया,तळेगावचे सरपंच ज्ञानेश्वर सिरसाट,जिवन आधारचे सुयोग गोरले,सुपर भारतचे मयुर खापरे आदींची उपस्थिती होती.आपल्याला हक्काचे पक्के घर बांधून दिल्याबद्दल वैशालीने लोकविकास संघटना,अ.भा.ग्रामिण पत्रकार संघ व आर्थिक सहकार्य करणार्या दानदात्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त आभार व्यक्त केले.यावेळी गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी
इरफान सौदागर, ऋषिकेश चराटे, श्याम पारीसे, वेदांत नवलकर, दत्तात्रेय अकोलकर आदींनी परिश्रम केले.