आशाताई बच्छाव
गावाकडील पांडव नदीत 15 वर्षीय मुलाचा नदीतील खड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
युवा मराठा न्यूज वेब पोर्टल प्रतिनिधी रवी शिरस्कार संग्रामपूर.
संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव गावाला लागुन असलेल्या पांडव नदीमध्ये आज दिनांक १८ ऑगेस्ट रोजी आंघोळ करायला गेलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा नदीतील जेसीबी साह्याने केलेल्या खड्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
घटनेतील सविस्तर असे की, काथरगाव येथील रहिवासी मुलगा रोहित नागेश खंडेराव वय वर्षे १५, हा सकाळी दिनांक १८ ऑगस्ट रोजी शेतीमध्ये मजुरी काम करायला गेला होता. शेतातून परत येताना दुपारी सुमारे तीन च्या दरम्यान नदीमध्ये त्याला गावातील काही मुले पोहताना दिसली. रोहित त्या मुलांजवळ गेला आणि मुलासोबत चर्चा करत बसला म्हणे…..
.….आज मी १८० रु कमावले आज मी मनसोक्त कचोऱ्या खाणार……
असे तो उत्स्फूर्तपणे मुलांसोबत बोलला.
पण मात्र त्याचे हे शब्द अखेरचेच ठरले जेव्हा तो नदीत आंघोळ करायला गेला होता तेव्हा,त्याला पोहता येत नसल्यामुळे मागच्या वर्षी नदीमध्ये जेसीबी च्या साहाय्याने करण्यात आलेल्या भल्या मोठया खड्डात त्याचा पाय घसरून तो पडला असता वाचवा!वाचवा !
या आकांताने ओरडला पण मात्र आपला जीव वाचवणे त्याला शक्य झाले नाही.अशी माहिती ग्रामीण रुग्णालयात आलेल्या गावातील नागरिकांनी दिली आहे.
ग्रामीण रुग्णालयात रोहित ला आणले असता डॉक्टरांनी त्याला लगेच मृत घोषित केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलीस हेड कॉन्सटेबल कैलाश मेश्रे तसेच पोलिस कॉन्सटेबल रवि चुंगडा
यांनी घटनेचा पंचनामा करून सदर बॉडी ला शवविच्छेदन करीता पाठवत असल्याची माहिती माहिती डॉ. हेमंत काटकर यांनी दिली.