आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: सलग दुसऱ्या दिवशीही विधिमंडळाच्या कामकाजावर विरोधकांचे आंदोलन सुरूच! सलग दुसऱ्या दिवशीही विधिमंडळाच्या कामकाजावर आंदोलकांनी बहिष्कार घातला . विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधी पक्षाने आंदोलन सुरू केले .विविध मागणीसाठी हे आंदोलन विरोधकांनी सुरू केले. त्यामध्ये ईडी सरकार हाय हाय अशा घोषणाही त्यांनी दिल्या ५० खोके सारे काही ओके अशा घोषणाही त्यांनी दिल्या. विधी मंडळाचे कामकाज मध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी त्यांनी मागणी केली. मुंबईतल्या खड्ड्यांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता हा मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा ही हा आमदार चौधरी यांनी विधिमंडळामध्ये मांडला . सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी विरोधकांनी ही आंदोलन पायऱ्यावर सुरू केले असल्याने विधिमंडळाचे पुढील कामकाज स्थगित करावे लागले. सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय विधिमंडळाचे कामकाज होऊ देणार नाही असेही विरोधकांनी या ठिकाणी ठणकावून सांगितले.