आशाताई बच्छाव
एकात्मिक बाल विकास अंतर्गत होणाऱ्या अंगणवाडी मधील मुलांच्या विकासाला अपंगत्व
युवा मराठा न्यूज वेब पोर्टल रवी शिरस्कार संग्रामपूर शहर
ग्रामपंचायत दुर्गादैत्य येथील अंगणवाडी मध्ये लहान मुलांची जवळपास 26 ते 27 पटसंख्या असून सदर अंगणवाडीची दैनिय अवस्था झालेली आहे 15 वित्त आयोगातून ग्रामपंचायत मार्फत अंगणवाडीला यावर्षी टेबल व खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती पण मात्र सदर अंगणवाडी मध्ये पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही, मुलांना आहार शिजवण्याकरिता गॅस सिलेंडरची सुद्धा व्यवस्था नाही आहार सेविका त्याच्या घरून शिजवून आणतात,तसेंच मुलांना बसण्याकरिता योग्य अशी व्यवस्था नाही मागील दिवसात होणाऱ्या सतत धार पावसामुळे अंगणवाडीचा हॉल पूर्णपणे गळल्यामुळे मुलांना बसताच आले नाही, बऱ्याच दिवसापासून अंगणवाडी हॉल मध्ये पूर्वेस भले- मोठे भगदाड पडले आहे स्लॅब हा पडल्यागत झालेला असल्यामुळे मुलांना पाठवण्याकरिता लाभार्थी पाल्यांना भीती निर्माण झालेली आहे. या सर्व अडचणीची सूचना अंगणवाडी सेविकांनी ग्रामपंचायत यांना कळविलेले असुन गेले कित्तेक दिवसांपासून करून टाकू- करून टाकू असे होकारार्थी उत्तरे मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे *एकात्मिक बाल विकास योजनेतील विकासाला जणु अपंगत्व आल्याचे दिसून येत आहे*.
एकात्मिक बाल विकास अंतर्गत लाभार्थी मुलांना मिळालेला धान्याचा दर्जा हा खाण्यायोग्य नसुन त्या धान्यावर बुरशी निर्माण झालेली दिसून आले तसेच वाटप करण्यात येणाऱ्या एकात्मिक बालविकास योजनेच्या आहाराच्या प्रमाणात एकसूत्रता नसल्याने मुले तो आहार पूर्ण सेवन करीत नाही.
तरी शासनाच्या एकात्मिक बाल विकास मार्फत तसेच ग्रामपंचात मधील मिळणाऱ्या अनेक योजनांच्या मार्फत रखडलेल्या अंगणवाडीला सहकार्य करण्याचे आवाहन गावकऱ्यांमार्फत होत आहे.