Home कोल्हापूर इचलकरंजी शहरातील दुकाने केली बंद

इचलकरंजी शहरातील दुकाने केली बंद

98
0

राजेंद्र पाटील राऊत

इचलकरंजी शहरातील दुकाने केली बंद

पेठ वडगांव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी
शहरातील सर्व दुकाने डिवायएसपी बी.बी. महामुनी यांनी बंद केली.
राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ असुन याच अनुशंघाने राज्य सरकारने काही नियमावली घालून शहरातील उद्योगधंदे बंद सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते.
इचलकरंजी शहरातील आज डिवायएसपी महामुनी यांनी सर्व दुकाने बंद केली.
अत्यावश्यक सेवा (बेकरी, किराणा ,औषधे,) वगळता बाकी सर्व दुकाने बंद करण्यास सांगितले .
विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. आज इचलकरंजी शहरात अचानकपणे कारवाई केल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दिवसभर जमावबंदी आदेश आणि रात्री संचारबंदी आदेश राज्य सरकारने लागू केले आहेत . पण आज सकाळी ११ वाजलेपासुन गांधी पुथळा येथून शहरातील मुख्य रोडवरील सर्व अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने बंद केली.
यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे
पोलीसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे हा लाँकडाँऊन आहे कि काय असा सवाल शहरातील नागरिकांतून होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सद्याचे कोरोनाचे संकट कमी प्रमाणात आढळुन येत असुन याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे .कोरोना संसर्ग वाढूनये याकरीता ही उपाययोजना इचलकरंजी पालिका , महसुल, व पोलीस प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे कठोर निर्बंध आणून सर्वसामान्य नागरीकांनी ,व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. (युवा मराठा न्युज नेटवर्क कोल्हापूर विभाग)

Previous articleशरद पवारांकडून माढा काढून घेतले आता पंढरपूर देखील राष्ट्रवादीला मिळू देणार नाही ‘
Next articleभाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची घेतली भेट; सांगितले भेटीमागचे कारण 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here