Home पश्चिम महाराष्ट्र शरद पवारांकडून माढा काढून घेतले आता पंढरपूर देखील राष्ट्रवादीला मिळू देणार नाही...

शरद पवारांकडून माढा काढून घेतले आता पंढरपूर देखील राष्ट्रवादीला मिळू देणार नाही ‘

129
0

राजेंद्र पाटील राऊत

शरद पवारांकडून माढा काढून घेतले आता पंढरपूर देखील राष्ट्रवादीला मिळू देणार नाही ‘
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप
पंढरपूर : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं . भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे . यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे .राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे . तर , भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे . भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मुख्य सामना होणार आहे .दिवसेंदिवस या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे . भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराची धुरा भाजपचे माढा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खांद्यावर आहे . त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात ते तळ ठोकून आहेत .
दरम्यान , खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच शरसंधान साधले आहे . ‘ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून जशी माढा लोकसभा मतदारसंघाची जागा काढून घेतली , तशी पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही ‘ . अशी सिंहगर्जना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे .

Previous articleमाऊली मंदिर संस्थान हसनाळ (प.मू) च्या वतीने माजी आ.हणमंतराव पाटील यांचा सत्कार संपन्न…
Next articleइचलकरंजी शहरातील दुकाने केली बंद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here