राजेंद्र पाटील राऊत
तलवाडा घाट ते शिऊर बंगला महामार्ग लवकर दुरुस्त करा. अन्यथा तिव्र आंदोलन . छावा संघटना.
—————————————-
ब्युरो चिफ:बबन निकम औरंगाबाद
सोलापूर, धुळे महामार्गावरील वाहतूक तलवाडा घाटामार्गे वळविण्यात आली आहे. आधीच परिसरातील रस्ते अरुंद, जागोजागी पडलेल्या असंख्य खड्डे ,त्यातच जड वाहनांची वर्दळ वाढल्याने या मार्गावर नियमीत बारा बारा तास वाहतूक खोळंबत आहे. यामुळे परिसरातील वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अखिल भारतीय छावा संघटनेच्या व हि.ज.क्रां.संघटनेच्या वतीने दुरुस्ती ची मागणी सा.बां.विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
औरंगाबाद मालेगाव महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी कायम असल्याचे दिसून येत आहे.त्यातच मनमाड येथून अतिशय ज्वलनशिल पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर , ॲसिड ,केमिकल भरुन वाहने मराठवाड्यात प्रवेश करतात. धुळे सोलापूर महामार्गावरील वाहतूक तलवाडा घाटा मार्गे वळविण्यात आल्याने अरुंद रस्त्यावरील वाहतुकीची गर्दी बघता रोज तलवाडा घाटा पासून ते वेरुळ फाट्या पर्यंत खड्डे चुकवत वाहन अरुंद पूलाच्या कठडावरुन किंवा खड्ड्यात रात्रीच्या वेळी रोज दोन-तीन अपघात होतांना दिसतात. आता पर्यंतच्या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवित हानी झाली नाही .परंतु अत्यंत ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या वाहनांना अचानक अपघात होऊन काही अनिष्ट घडले तर कित्येक वाहने यात नष्ट होण्याची भीती असल्याने बांधकाम विभागाने या अरुंद खड्डेमय रस्त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे वाहन चालक व छावा संघटनेचे किशोर मगर आणि हि.ज.क्रां.सेनेचे अजय पाटील , चंद्रशेखर साळुंके, संतोष निकम यांनी स्वाक्षऱ्या सह निवेदन सादर केले आहेत.