Home Breaking News अकोला शहर विभागाचे तत्कालीन विभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांना सर्वोत्कृष्ट...

अकोला शहर विभागाचे तत्कालीन विभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांना सर्वोत्कृष्ट अन्वेषणासाठी केंद्र शासनामार्फत दिले जाणारे केंद्रीय गृहमंत्री पदक-२०२१ जाहीर करण्यात आले.

160
0

अकोला करीता गर्व ची बाब

अकोला: अकोला शहर विभागाचे तत्कालीन विभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांना सर्वोत्कृष्ट अन्वेषणासाठी केंद्र शासनामार्फत दिले जाणारे केंद्रीय गृहमंत्री पदक-२०२१ जाहीर करण्यात आले.

सतिश लाहुळकर ब्युरो चीफ अकोला

केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयामार्फत सर्वोत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन सन्मानित केले जाते. त्या अनुषंगाने २०२१ करीता पोलीस तपासकामामध्ये उत्कृष्ट प्राविण्य दाखविणाऱ्या पोलीस अधिकारी, अंमलदारांच्या शिफारशी पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत मागविण्यात आल्या होत्या.

त्यानुसार अकोल्याचे जिल्हा पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अकोला शहर विभागाचे तत्कालीन विभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यांतर्गत अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ नुसार दाखल असलेल्या अतिशय गंभीर व संवेदनशील गुन्ह्याचा उत्कृष्टपणे तपास केल्याने केंद्रीय गृहमंत्री पदक-२०२१ साठी पोलीस महासंचालकांकडे प्रस्ताव पाठविला होता.

त्यानुसार, उमेश माने पाटील यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून केंद्रीय गृहमंत्री पदक-२०२१ जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल या यशाबद्दल पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांचे कौतुक केले.व सर्व कडून कौतुक होत आहे.

Previous articleपालघरमध्ये जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन.
Next articleसेन्सेक्स मध्ये ३०० अंकाची वाढ तर निफ्टीतही ८० अंकाची लाभ तर आजच्या तेजीने गुतंवणुकदारांची झाली ५० हजार कोटींची कमाई
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here