आशाताई बच्छाव
पाच महसुल मंडळातील तब्बल चार-हजार-आठशे- एकोणीस हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांचे नुकसान
पिकांचे पंचनामे करण्याची शेतकऱ्याची मागणी
युवा मराठा न्यूज वेब पोर्टल रवि शिरस्कार संग्रामपूर शहर
संग्रामपूर तालुक्यात तंब्बल पाच महसूल मंडळ असून स़ुद्धा जुलै महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे हनुमान सागर धरणाचे पाणी वान नदीमध्ये सोडल्याने पूर्णा नदी आणि वान नदीला भरपूर प्रमाणात पाणी आल्याने या नद्यांच्या अवतीभोवती असलेल्या खेड्यावरील शेतांमध्ये पूर्णपणे पाणी साचले असुन शेतींमधले पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शेतकर्यांचे भरपुर प्रमाणात नुकसान झाले आहे . तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक कवठळ आणि संग्रामपूर हे तीन मंडळ महसूल मंडळातील प्राथमिक अंदाजानुसार चार हजार आठशे एकोणीस हेक्टरमधील कपाशी, ज्वारी, मूग, उडीद, तूर, अशा विविध प्रकारच्या पिकाचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अद्याप ह्या शेतींमधले पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनामे प्राप्त झाले नाहीत तसेच संग्रामपूर तालुक्यातील पेरणीयोग्य असलेले त्रेचाळीस हजार आठशे एकवीस हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी जवळपास ८५% पेरणी झाली असल्याचा अंदाज आहे तसेच संग्रामपूर तालुक्यात सोनाळा बावनबीर कवठळ पातुर्डा बुद्रुक व संग्रामपूर हि ५ महसूल मंडळे आहेत आणि सुरुवातीला पाऊस आला नाही म्हणून काही भागामध्ये दुबार पेरणीचे संकट सुध्दा शेतकऱ्यांच्या डोक्यावर आले होते, काही पिकांचे अंकुर उगऊन वर आले असतानाच दिनांक १७ आणि १८जुलै रोजीपासून सततधार पाऊस झाल्याने व वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणातील पाण्याची धार वान नदीपात्रात सोडल्यामुळे तसेच अकोला व अमरावती जिल्ह्यांमध्ये सुद्धा अतिवृष्टी होवून पूर्णा नदीला खूप मोठा पूर आला आणि सततधार पाऊस व पुराच्या पाण्यामुळे नद्यांनजवळील परिसरात शेतींमध्ये खूप प्रमाणात पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे शेतकरी हा तूर्तास हवालदिल झाला आहे पातुर्डा येथील सरपंच शैलजा भोंगळ यांनी तहसील कार्यालयामार्फत चक्क मुख्यमंत्री साहेबांना मेल द्वारे निवेदन दिले होते परंतु आजपर्यंत नुकसान झाल्याचे पंचनामे संग्रामपूर तहसील कार्यालयाकडे अद्याप प्राप्त झालेले नसल्याची माहिती महसूल विभागाने दिलेली आहे.