Home Breaking News _पालीवाल समाजाचे रक्षाबंधन हे मानवता एकता दिवसाने साजरे

_पालीवाल समाजाचे रक्षाबंधन हे मानवता एकता दिवसाने साजरे

288
0

_पालीवाल समाजाचे रक्षाबंधन हे मानवता एकता दिवसाने साजरे

बूलडाणा :- ब्यूरोचीफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज

आजच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील 23 गावात 1200 च्या वर पालीवाल समाज बंधुनी श्रधांजली अर्पण केल्याची माहिती आहे. रक्षा बंधन साजरा न करता एकता दिवस साजरा केला.

 

 

संग्रामपूर (बुलढाणा) – श्रावण पौर्णिमेला देशभरात राखी पौर्णिमा साजरी होते. परंतु देशातील काण्याकोपऱ्यात पसरलेला पालीवाल ब्राह्मण समाज हा दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा करीत नाही. तर पालीवाल एकता दिवस साजरा करतात. आज सकाळी 9 वाजता देशातील प्रत्येक शहरात जिथे पालीवाल समाज असेल तिथे एकत्र येऊन एका जागेवर आपल्या पूर्वजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात. याच निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील वानखेड येथील बालाजी मंदिरात आज 22 ऑगस्टचे सकाळी 9 वाजता पालीवाल समाजातील सर्वांनी एकत्र येऊन त्या वीरगती प्राप्त झालेल्या धौला चौतरा यांना स्मरण करून प्रतिमेचे पूजन मदन पालीवाल यांच्या हातून करण्यात आले. यानंतर पालीवाल समाजातील युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या महापुरुषांच्या जीवनावर येथील मदन पालीवाल व पवन पालीवाल यांनी प्रकाश टाकला. आजच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील 23 गावात 1200 च्या वर पालीवाल समाज बंधुनी श्रधांजली अर्पण केल्याची माहिती आहे. रक्षा बंधन साजरा न करता एकता दिवस साजरा केला. यावेळी मदन पालीवाल, तुलसीराम पालीवाल, नारायण पालीवाल, हनुमान पालीवाल, गिरीश पालीवाल, घनश्याम पालीवाल, व्हिपीन पालीवाल, रितेश पालीवाल, आकाश पालीवाल, (पत्रकार )टीना पालीवाल,मनोज पालीवाल, नारू पालीवाल, मोहन पालीवाल, डॉ. दीपक पालीवाल, रूपेश पालीवाल, ,शामसूंदर बंन्सीलाल पालीवाल शामू पालीवाल,, रामेश्वर पालीवाल, ,मोहीत पालीवाल, सूमित पालीवाल आदी समाजातील पुरुष महिला उपस्थित होते.

Previous articleसंस्थान वरील सर्व कार्यक्रम रद्द नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई ठाणेदार मोरे
Next articleमोकाट गाढवांमुळे शेतकरी त्रस्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here