Home बुलढाणा ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे धुळ खात बसला आहे गावचा विकास तहसील कार्यालयात निवेदन

ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे धुळ खात बसला आहे गावचा विकास तहसील कार्यालयात निवेदन

80
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220629-WA0004.jpg

 

ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे धुळ खात बसला आहे गावचा विकास

तहसील कार्यालयात निवेदन

युवा मराठा न्यूज,वेब नेटवर्क रवींद्र शिरस्कार,संग्रामपूर

संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासीबहुल भागातील सायखेड ग्रामपंचायतचा भोंगळ कारभारामुळे गावातील विकास धुळ खात बसला आहे त्यामुळे गावात अनेक समस्या वाढ होताना दिसत आहे.
सायखेड ग्रामपंचायत मध्ये सरपंच व सदस्यांचा कार्यकाल संपला आहे तद्वत प्रशासक नियुक्ती करण्यात आलेली आहे यामध्ये प्रशासक ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे गावाचा विकासासाठी अडथळा निर्माण झाला आहे. गावकऱ्याची गैरसोय होत असुन त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
सायखेड ग्रामपंचायत जणू ठेकेदार चालवत असल्याचे भासवत आहे
. ग्रामपंचायतीत आलेल्या निधीची कल्पना देवच जाणे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे करिता दिनांक 28 जून रोजी तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले . यामध्ये संपूर्ण ग्रामपंचायतचा पाळा देण्यात आला तसेच यामध्ये अनेक समस्या मार्गी लागाव्या या करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंगळी बु. येथील कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये गावाचे रस्ते नाल्या व सौंदर्यकरण व ग्रामसेवक चा ढेपाळलेला कारभाराची व मनमानी कारभार करत असलेली प्रशासक यांची सखोल चौकशी करण्यात यावी असे नमुद केलेले आहे. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष अरुण निंबोळकार,तालुका सचिव श्रीकांत झाल्टे, रमजान भारसाकडे ,महिंद्रा भास्कर, जिल्हा सहसचिव श्यामभाऊ बोरपी, प्रदीप झाल्टे व अनेक कार्यकर्ते हजर होते

Previous articleदिव्यांग निधी दिला तरी कधी शासनाने दिला आधार तरी वासखेडी ग्रामपंचायत आहे निराधार…
Next articleविद्यार्थी पटसंख्या अभावी बहुतांशी जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here