आशाताई बच्छाव
दिव्यांग निधी दिला तरी कधी शासनाने दिला आधार तरी वासखेडी ग्रामपंचायत आहे निराधार…
वासखेडी/साक्री दिपक जाधव – येथील ग्रामपंचायतीचा कारभार चालविणारे प्रशासक आहेत तरी कुठे यांना जणुकाही गावातील ग्रां,पं, कार्यालयाचा आणि गावकर्यांचा विसरच पडला ,विकास योजना तर दुरच पण ग्रामस्थांच्या प्रतिक्रियेवर लक्षच नाही यांचे ,समस्यांचे निराकरण करायचे तरी कोणाकडे मग? फोन नेहमी लागतो पण उचलायला वेळ नाही ,ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल ,संपुर्ण उन्हाळा निघुन गेला पण ,पाण्याची साधी समस्या ही सुटली नाही,प्रश्न सुटेल कसा मग,प्रशासकच नोट रीचीबल आसेल तर मग..ग्रामसेवकांचा तर प्रश्नच येत नाही,ग्रामसेवकांना तर दुपारीच वेळ आवडते ,सकाळी तर वेळच नाही मिळत,गेल्या बर्याच दिवसापासुन दिव्यांग निधी साठी वेळोवेळी भेट देवुनही काहीच हालचाली नाहीत,शासन निर्णयानुसार आज पावेतो एकही वेळेस एक कवडी रूपया अथवा भेट वस्तु ही दिव्यांग अपंग बांधवांच्या पदरी पडलेली नाही ,याला आपण काय म्हणाल , तर या बांधवांनी आपल्या न्यायासाठी जायचे तरी कोणाकडे ,शासनाने दिव्यांग अपंग बांधवांन संदर्भातील योजनांची चौकशी करून दिव्यांग बांधवांचे समस्याचे निराकरण व्हावे अशी खंत अपंग बांधव करताय,जणु आम्हांला कोणी वालीच नाही असेही बोलले जाते,शासनाने दिलेला दिव्यांगाचा आधार नेला तरी कुणी,होत नाही वितरीत हा निधी तर होईल मग तर खरी कमाई,अशी काहीशी भावना या बांधवांची आहे,जि,प,पं,स,सदस्य यांनीही काहीसा दिलासा दायक आवाज उठवण्याची गरज आहे,दिव्यांगांचा हक्काचा निधी त्यांना दिलाच गेला पाहीजेल अशीही चर्चा जोर धरू लागली आहे,दिव्यांग व्यथा तर दुरच पण भेटायलाही कोणी अधिकारी तयार नाही,