राजेंद्र पाटील राऊत
दिवाळीनंतर कोणाचे दिवाळे कोणाची दिवाळी….? निवडणुका दिवाळीनंतर होणार राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे..!
मुंबई (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)
महाराष्ट्र मध्ये 22 महानगरपालिका सहा जिल्हा परिषद नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. निवडणुका जून-जुलैमध्ये घेण्यास निवडणूक आयोग तयार असल्याचे वृत्त चुकीचा असून असे कोणतेही प्रतिज्ञापत्र दिले नाही.
जून-जुलैमध्ये निवडणुका होणार याबाबतचे वृत्त मध्ये अनेक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते परंतु या बाबतीत सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणतेही प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने दाखल केले नाही अशी माहिती माहिती आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली.
एकूण बावीस महानगरपालिका 25 जिल्हा परिषद 275 पंचायत समिती 210 नगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुका एकाच रक्त घेणे शक्य नाही त्या दोन तीन टक्के घ्यावे लागतील असेही म्हणजे आयोगाचे आहे त्यामुळे 4 मे रोजी जरी सुनावणी झाली नाही तरी जून-जुलैमध्ये किंवा पावसाळ्यापूर्वी या निवडणुका होण्याची शक्यता नाही दिवाळीनंतर या निवडणुकांचा बार उडणार हे तर आता निश्चित होत आहे तसेच ही प्रक्रिया सुरू झाली तरी किमान 35 दिवसांच्या निवडणूक कार्यक्रम असतो त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपची राजकीय खेळी किंवा राजकीय दिवाळी चे लाडू होणार एवढे मात्र नक्की झाले आहे त्यामुळे आता मुदत संपलेल्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दिवाळीनंतरच होती हे आता निश्चित होऊ लागले आहे त्यामुळे अजून काही महिने निवडणुकांसाठी वाट पाहण्याची वेळ ही राजकीयदृष्ट्या सर्व उमेदवारांवर आलेली आहे.
मुदत संपलेल्या अजून पर्यंत संपणाऱ्या महानगरपालिका पुढील प्रमाणे आहेत कोल्हापूर पुणे पिंपरी-चिंचवड ठाणे भिवंडी निजामपूर मुंबई नवी मुंबई कल्याण-डोंबिवली उल्हासनगर वसई-विरार पनवेल मालेगाव नागपूर सोलापूर अकोला परभणी लातूर अमरावती चंद्रपूर नांदेड आणि औरंगाबाद अशा या 22 महानगरपालिका आहेत त्यांची मुदत जूनमध्ये संपला आहे आणि याच्या निवडणुका आता दिवाळी पर्यंत होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा 2019 लोकसभेचे प्रमाणेच दिवाळीमध्ये की निवडणुका होऊन राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागलेले आहेत.