राजेंद्र पाटील राऊत
कोळकेवाडीत कालव्यात चौघे बुडाले ; दोघांना वाचिवण्यात यश, दोघे बेपत्ता
✍️ चिपळूण: विजय पवार कार्यकारी संपादक मुंबई.युवा मराठा न्यूज
चिपळूण /अलोरे -: येथील चार युवक कोळकेवाडी येथे पोहण्यासाठी गेले असता कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडत होते. त्यातील दोघांना तेथील धनगर बांधवांनी वाचवले. मात्र दोघे अद्याप बेपत्ता आहेत. त्यात अलोरे सोमेश्वर मंदिर नजीक राहणारा सुजय संजय गावठे व त्याची मैत्रीण ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर यांचा समावेश आहे.
याबाबत उपलब्ध माहितीनुसार बुधवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान दरम्यान सुजय गावठे, ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर सोबत शाहीन कुट्टीनो , रुद्र जंगम आणि कुत्रा कोळकेवाडी टप्पा चारनजीक कालव्यात पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते अडकले. पाण्यात अडकल्यावर चौघांनी आरडा ओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथेच काम करणाऱ्या धनगर बांधवानी धाव घेतली आणि आपल्या जीवाची पर्वा न करता रुद्र आणि शाहीन याना बाहेर काढले.
या वेळी सुजय सुद्धा बाहेर येत होता. मात्र ऐश्वर्या बुडत असल्याचे बघून तो पाण्यात परत गेला. त्यानंतर दोघे बेपत्ता झाले.
अलोरे पंचक्रोशीतील सरपंच कोळकेवाडी श्री. निलेश कदम,प्रदीप सकपाळ , श्री. बाबा वरक, महेश शिंदे, ओमकार शिंदे, विशाल शिंदे , मंदार कदम चेतन शिंदे, प्रतीक पालकर, किशोर कदम, ईश्वर देवरुखकर, राकेश देवरुखकर युवा कार्यकर्त्यांनी तसेच सर्व कोळकेवाडी तांबडवाडी ग्रामस्थांनी कोळकेवाडी धरण परिसराकडे धाव घेतली. बचावकार्य सुरुवात झाली. अलोरे शिरगाव पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना या दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर पाहणी केली बेपत्ता असलेल्या दोघांना वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. मात्र रात्र वाढू लागल्याने बचावकार्य साडेसातनंतर थांबवण्यात आले.