Home महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा ! राज्यात अनेक गावांचा इतिहास मोडीत

ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा ! राज्यात अनेक गावांचा इतिहास मोडीत

192

राजेंद्र पाटील राऊत

ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा ! राज्यात अनेक गावांचा इतिहास मोडीत
युवा मराठा न्यूज नेटवर्क पुणे ग्रामीण प्रतिनिधी महादेव घोलप.
मुंबई: कोरोना महामारीमुळे लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या अन् गावागावात निवडणुकांचा धुरळा उडू लागला आहे . लॉकडाऊनमुळे निपचित पडलेल्या खेड्यापाड्यात आता जल्लोष दिसत आहे . यंदाची निवडणूक अनेक दृष्टीने महत्वाची आहे . लोकप्रतिनिधींच्या आवाहनानंतर अनेक गावांमध्ये वाद – विवाद विसरून गावाच्या विकासासाठी विरोधक एकत्र आले . तर अनेक वर्षांपासून बिनविरोध होणाऱ्या गावांमध्ये निवडणूक लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे . राज्यातील अशाच काही ग्रामपंचायतींचा आढावा .तब्बल 45 वर्षे बिनविरोध असलेल्या बार्शी तालुक्यातील मळेगाव येथे यंदा मात्र निवडणुका लागल्या आहेत . शेवटच्या दिवशी देखील अर्ज माघारी न घेतल्याने सर्व तिन्ही प्रभागासाठी मतदान प्रक्रिया पार पडेल . तिन्ही प्रभागातून 9 उमेदवार ग्रामस्थांना निवडून द्यायचे आहेत . ज्यासाठी 22 उमेदवार रिंगणात उतरणार आहेत . बार्शी तालुक्यातील मळेगावमध्ये तब्बल 9 निवडणुका बिनविरोध करून सलग 50 वर्षे बिनविरोध राहण्याचा प्रयत्न यंदाच्या निवडणुकात होता . मात्र , अर्ज कायम राहिल्याने बिनविरोध उमरगा तालुक्यात सर्वाधिक 10 ग्रामपंचायत बिनविरोध उस्मानाबाद जिल्ह्यातील 428 पैकी 40 ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असून यात सर्वाधिक 10 ग्रामपंचायत उमरगा तालुक्यातील आहेत तर कळंब , परंडा , लोहारा या तालुक्यात प्रत्येकी 5 , उस्मानाबाद तालुका 3 , तुळजापूर 4 , भूम तालुका 7 व वाशी तालुक्यातील 1 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांनी दिली .

Previous articleगरिबांना मोफत लस देण्याबाबत केंद्र सरकारकडे आग्रह धरणार : राजेश टोपे
Next articleपत्रकार दिनानिमित युवा मराठाचे राजेंद्र पाटील राऊत यांचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.