Home Breaking News मराठा आरक्षणाचा प्रश्न आता :- शरद पवारांच्या दरबारी 

मराठा आरक्षणाचा प्रश्न आता :- शरद पवारांच्या दरबारी 

211

 

मराठा आरक्षणाचा प्रश्न आता :- शरद पवारांच्या दरबारी
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात तीन पक्षांना एकत्र आणून सरकार स्थापन केले. तसेच आता त्यांनी पुढाकार घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे. यासाठी आम्ही लवकरच शरद पवार यांची भेट घेण्यात असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी सांगितले आहे.

शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे. त्यांनी मराठा आरक्षणाविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही यापूर्वीही मराठा आंदोलकांकडून करण्यात आली होती. मात्र, तुर्तास शरद पवार मराठा आरक्षणासंदर्भात मोजके आणि सावधपणाने बोलण्यावर भर देत आहेत.

मात्र, आता मराठा क्रांती मोर्चाचे थेट त्यांची भेट घेण्याचे ठरवले आहे.

त्यामुळे आता महाविकासआघाडीचे मार्गदर्शकअसलेले शरद पवार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय भूमिका घेणार आणि हा प्रश्न सुटणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे…..⭕

Previous article*अबुलगा येथील शेतकऱ्यांने दिला आत्महत्या करण्याचा चा इशारा…*
Next article🛑 बेस्टच्या सेवेत असलेल्या एस.टी कर्मचाऱ्यांना ,रोख भोजन भत्ता मिळणार :- अनिल परब 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.