Home कोल्हापूर कळंबा कारागृहांतर्गत सुरक्षा यंत्रणेचे तिन तेरा

कळंबा कारागृहांतर्गत सुरक्षा यंत्रणेचे तिन तेरा

167

राजेंद्र पाटील राऊत

कळंबा कारागृहांतर्गत सुरक्षा यंत्रणेचे तिन तेरा

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहांतर्गत सुरक्षा यंत्रणेचे पुन्हा धिंडवडे निघाले आहेत. बुधवारी सकाळी कळंबा कारागृहात 10 मोबाईल, 775 ग्रॅम गांजाचा साठा, 5 चार्जर, 2 पेनड्राईव्हसह सिमकार्ड आढळून आल्याने प्रशासन हादरले आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दोघा अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले असून, दिवसभरात कारागृहांतर्गत सर्वच बॅरेकची चारवेळा झडती घेण्यात आली.
कळंबा कारागृहात गांजा, मोबाईल सापडण्याची सरत्या वर्षातील ही पाचवी घटना आहे. 10 नोव्हेंबरला चेंडूतून कैद्यांना गांजा पुरविण्याचा प्रयत्न झाला होता.
त्यानंतर दोन मोबाईल आढळून आले. या घटनांचा छडा लागण्यापूर्वीच मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता आलिशान मोटारीतून आलेल्या संशयितांनी कापडात गुंडाळलेल्या तीन पुडक्यांतून कैद्यांना मोबाईलसह गांजा व अन्य साहित्य भिंतीपलीकडू आत फेकून पुरविण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.
पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, मध्यरात्री मोटारीतून दोन संशयित कळंबा कारागृहालगत उजव्या बाजूच्या संरक्षक भिंतीजवळ आले. पांढर्‍या कापडात गुंडाळलेली तीन पुडकी भिंतीवरून कारागृहात फेकून दोघे पसार झाले. हा प्रकार बुधवारी सकाळी सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आला. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांना याबाबत माहिती दिली.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleरमेश निंबा बच्छावला अवदसा आठवली,साडेतीन हजाराची लाच घेतांना तुरुंगाची कोठडी नशिबी आली
Next articleकिल्ले राजगडावर अनेक वर्षापासून लपलेला चोर दरवाजा सापडला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.