आशाताई बच्छाव
युवकक्रांती महाआघाडीने विरोधकांना फटकारले.
पेठवडगाव राहुल शिंदे: युवकक्रांती महाआघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोहनलाल माळी म्हणालेकी आराखड्याबद्दल बरीच वर्ष चर्चा चालू आहे. सुरुवात ही विकास आराखड्याची यादव गटाने केलेली आहे. त्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले. जबाबदार व्यक्तीने खालच्या पातळी वर जाऊन माझ्यावर टीका केली. 2012 साली ठराव झाला. पुण्याच्या एजन्सीला वर्क ऑर्डर दिली.ज्यांनी कामाची सुरुवात केली.त्यांना जबाबदारी झटकता येत नाही.2021ला सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी विरोध केलेला नाही.मी अल्पसंख्यांक असल्यामुळे माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये विरोधकांना सडेतोड उत्तर दिले जाईल्.असा इशारा माळी यांनी दिला.
माजी उपनगराध्यक्ष रंगराव बावडेकर म्हणाले की राजकारणा मध्ये एकमेकावर टीका करावी. पण खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये.आपण वडगाव शहरांमध्ये एक सुसंस्कृत आदर्श व्यक्तिमत्व आहात.
या बाबत गेली दोन वर्ष एक मेकांच्या वरती आरोप होत होते.युवक क्रांती महाआघाडीने खासदार धैर्यशील मानेंच्या साथीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आराखडा रद्द करण्याचे आश्वासन दिले होते.