आशाताई बच्छाव
संवेदना जागृत करायचं दायित्व आणि कर्तव्य साहित्यकारांचेच—– प्रा.वा. ना.आंधळे
दैनिक युवा मराठा
लक्ष्मण आवारे चांदवड
दिवसेंदिवस वाढत जाणारी धावपळ व अतिव्यस्तता यामुळे मानवी संवेदना तीव्र गतीने नष्ट होत आहेत.ही सामाजिक व सांस्कृतिक हानी असून ती हानी थांबवण्याचे दायित्व आणि कर्तव्य हे साहित्यकारांचे आहे.साहित्यानं आजवर वेळोवेळी समाजमनाचे व समाजभानाचे मूल्यसंवर्धन केले असून संत साहित्यापासून तर आधुनिक साहित्यापर्यंत त्याचे सम्यक दर्शन घडते.आजच्या नव्या पिढीचे वाचन अल्पस्वल्प झाल्याची खन्तही त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली.मध्यप्रदेशातील इंदूर येथे मराठी भाषा संरक्षण समिती व पद्मभूषण तात्यासाहेब सरवटे व राजकवी झोकरकर यांचे स्मृतिप्रीत्यर्थ प्रीतमलाल दुआ सभागृहात दि.१३ व १४ एप्रिल २०२४ रोजी आयोजित दोन दिवसीय साहित्य संमेलनात कवी प्रा.वा. ना.आंधळे आंधळे हे कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.सत्तर मिनिटांच्या आपल्या भाषणातून कवितेचे सामर्थ्य आणि कवितेच्या विविधांगी प्रवाहाचे दर्शन श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद देत स्वीकारले.श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव पंचेचाळीस भाषेत अनुवादित झालेली प्रा.आंधळे यांची *आई ! मला जन्म घेऊ दे* ही स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात सर्वश्रुत असलेल्या कवितेचे सादरीकरण करीत श्रोत्यांना भावुक केले.
नियोजित कवी संमेलनात मध्यप्रदेशातील पंचवीस कवी कवयित्रींनी काव्यवाचन करीत सभागृहास मंत्रमुग्ध केले.यशस्वी रंजन व प्रबोधन करण्यात कवी श्रीकांत तारे,सुजाता देशपांडे,माधवी करमळकर,सुषमा ठाकूर,कल्पना चौधरी,कविता पुणतांबेकर,ज्योती निकम,यशवन्त गोरे,मदन बावडे, संजीव दिघे,आशुतोष देशपांडे यांच्या सुश्राव्य काव्यवाचनाने चांगलीच सरशी केली.सूत्र संचलन कवी श्रीकांत तारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संमेलनाचे प्रमुख आयोजक साहित्यिक तथा पत्रकार श्री.अनिलकुमार धडवाईवाले यांनी केले.