Home सामाजिक काही उपकार सदैव स्मरणात ठेवायचे असतात

काही उपकार सदैव स्मरणात ठेवायचे असतात

67
0

आशाताई बच्छाव

1000302555.jpg

काही उपकार सदैव स्मरणात ठेवायचे असतात

उपकार करून रस्त्यावर ठेवायचे असतात ही मंजरी प्रचलित असली तरीही उपकार करणाऱ्याची आभार मानणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण उपकार करणारा निस्वार्थपणे व अडचणीच्या वेळेस आपली मदत करून आपल्याबद्दल सहानुभूतीची भावना ठेवत असतो. ‘उपकार फेडायचे नाहीत’ या वाक्याला दोन सावल्या आहेत. त्यातली पहिली सावली म्हणजे ‘काही उपकार सदैव स्मरणात ठेवायचे असतात’ ही आणि दुसरी सावली म्हणजे ‘कोणतेच उपकार विसरायचे नसतात’ ही ! खरंच काही उपकारच असे असतात, की त्यांची परतफेड होवू शकत नाही. असे उपकार फेडून विसरून जाण्यापेक्षा त्या उपकारांची जाणीव ठेवून त्याच प्रकारची मदत दुसऱ्याला करणे हीच खरे तर उपकारकर्त्या प्रतिची कृतज्ञता असते. परंतु अलीकडे कृतज्ञतेची जाणीव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देवून बाजूला केलं जातं. ज्या जिन्याने वर चढता येणे शक्य होते, त्या जिन्याचाच विसर पडतो आणि या घटनाक्रमाला जगरहाटी म्हणण्याची हिणकसता बऱ्याच वेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.
माझ्यावर झालेले माझ्या मात्यापित्यांचे, गुरूंचे व्यक्तिगत वाटचाल करीत असतांना सभोवतीच्या असंख्य ज्ञात अज्ञात लोकांचे उपकार हे माझ्या स्मरण कप्प्यातील एक सुगंधी भाग असून त्यावर मी माझ्या सदसद्विवेक बुद्धीचे सम्यकपणे भरणपोषण करीत आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले माणूसपण जिवंत ठेवणे होय. आणि या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत, हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. उपकार फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, हा मौलिक विचार आजच्या घडीला सर्वांसाठीच कमालीचा उपयुक्त आहे, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल?

रामभाऊ आवारे
प्रदेश कार्याध्यक्ष वारकरी मंच महाराष्ट्र राज्य

Previous articleकु. अस्मिता कांबळे वैद्यकीय सेवेसाठी सज्ज!
Next articleसंवेदना जागृत करायचं दायित्व आणि कर्तव्य साहित्यकारांचेच—– प्रा.वा. ना.आंधळे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here