आशाताई बच्छाव
अमरावती जिल्ह्यातील २५० एसटी बस वरील शासकीय जाहिराती काढल्या, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी
१६मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर लगेच आदर्श आचारसंहिते अमलात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहेत. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एसटी बसेस वरील शासकीय जाहिराताचे फलक तातडीने काढण्याची कार्यवाही एसटी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. विभागातील २५०हुन अधिक बसेस वरील शासकीय जाहिराती काढण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी एसटी महामंडळाने खबरदारीची पावली उचलली आहे. एस टी महामंडळाच्या बसेस वर”निर्णय गतिमान महाराष्ट्र वेगवान”या राज्य शासनाच्या आणि अन्न राजकीय जाहिराती तात्काळ हटविण्याचा सूचना एसटी महामंडळाने विभागीय नियंत्रण तसेच एसटी आगार व्यवस्थापकांना दिल्या आहेत. देशात १८व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ नये या अनुषंगाने एसटी बसून राजकीय जाहिराती काढून टाकण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. राजकीय जाहिराता काढण्यास टाळाटाळ केल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी प्रत्येक स्तरावर घेण्यात यावी अशी सूचना महामंडळाने दिल्या होत्या. या अनुषंगाने अमरावती रा.प.म. विभागाचे विभाग नियंत्रण यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या ८ आगारातील३४३ एसटी बस वरील २५० बसेस वर असलेल्या शासकीय व राजकीय जाहीरताचे लावलेले फलक हटविण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशानुसार एसटी २५० बसेस वरील जाहिरातीचे फलक हटविलेले आहे. अशी माहिती आमच्या प्रतिनिधींना अमरावती विभाग नियंत्रक एसटी महामंडळाचे निलेश बेलसरे यांनी माहिती दिली आहे.