आशाताई बच्छाव
वकिला विरुद्ध फसवणुकी गुन्हा; बार असोशियनआक्रमक, आयुक्तालयावर धडकले वकील.
———-
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
अमरावती येथे न्यायालयात मृत व्यक्तीच्या नावावर . तोतया उभा करून मासोद येथील जमीन व्याहाराप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ऑड. वासुसेन देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या विरोधात अमरावती जिल्हा वकील संघ चांगलाच आक्रमक झाला आहे. या विरोधात वकील संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी १८ मार्च रोजी पोलीस आयुक्तालयावर धडक दिली. आयुक्तलयाच्या पायऱ्यावर धरणे दिली. या गुन्ह्यातून ऑड.वासुसेन देशमुख यांचे नाव कमी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी वकील संघाच्या वतीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. निवेदनानुसार, ऑड.वासुसेन देशमुख यांच्याकडे एक पक्षकाराने मोहम्मद इक्बाल भुरेखान यांच्यासोबत झालेल्या व्याहाराची टोकण चिठ्ठी दाखवून आपल्याला या शेताचा व्यावहार करायचा आहे, असे सांगितले. त्यावर ऑड. देशमुख यांनी पक्षकरास जाहीर नोटीस प्रकाशित झाल्यावर त्यांच्याकडे आलेल्या हरकतीवरून मोहम्मद इकबाल भुरेखान हे मयत झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर १५ मार्च रोजी अज्ञात व्यक्तींनी मृतक मोहम्मद इक्बाल भुरेखान यांच्या नावाने खोट्या दस्तऐवजाच्या आधारावर शेतीचे खरेदी सहनिबंधक यांच्याकडे लावली. ही बाब मोहम्मद इकबाल भुरेखान यांचे जावई तऔसइफकआजइ यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी खरेदीचा व्यवहार थांबविला. या प्रकरणात संबंधित आरोपी सोबतच ऑड.वासुसेन देशमुख यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दहा आरोपींना अटक देखील करण्यात आली. तर आंदोलन अधिक आक्रमक पाहता या प्रकरणात वकील संघाचे पदाधिकारी व शेकडो सदस्यांनी पोलीस आयुक्तालय गाठले व पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची भेट घेऊन चर्चा केली. याप्रकरणी ऑड. देशमुख यांची भूमिका फक्त पक्ष करायचे वकील म्हणून जाहीर नोटीस देण्यापर्यंत होती. परंतु पोलिसांनी शहानिशा न करता ऑड. देशमुख यांचे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असा आरोप वकिलांनी निवेदनातून केला आहे. त्यामुळे या गुन्ह्यातून त्यांचे नाव कमी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे निवेदनातून स्पष्ट केले आहे. निवेदन देताना वकील संघाचे अध्यक्ष गिरीश जाखड, सचिव उमेश इंगळे, उपाध्यक्ष नीता टिखिले, सुदर्शन पिंपळगावकर, प्रशांत देशपांडे, चंद्रशेखर डोरले, रसिका उके, पियुष डहाके, पंकज यादगिरी, भूमिका वानखडे, यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते. व याच प्रकरणात १९ मार्चला वकील संघमार्फत एक दिवसीय लेखणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.