आशाताई बच्छाव
आधी जागा वाटपावर निर्णय घ्या, नाहीतर आम्ही स्वातंत्र्य: बच्चू कडू यांचा महायुतीला इशारा.
————
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
भाजपाला जशी लोकसभा महत्त्वाची आहे, तशीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे असेआ. बच्चू कडू म्हणाले. लहान पक्षासोबत अद्याप कुठलीही बोलणी झालेली नाही. त्यामुळे आधी आम्हाला विधानसभेमध्ये किती जागा देणार हे भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पष्ट करावे, नाहीतर आम्ही स्वातंत्र्य आहोत, संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी महायुतीला दिलेल्या आहे. आज दिनांक 3 रोजी अमरावती येथे माध्यमाचे बोलत होते. जोपर्यंत विधानसभेचे बोलणे होत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही विचार केलेला नाही. लोकसभेचे सध्या आमची तयारी नाही. मात्र कोणाला निवडून आणायचे आणि कोणाला पाळायचे आम्ही ठरवू असे बच्चू कडू म्हणाले. दरम्यान खासदार नवनीत राणा सध्या भाजपच्या वाटेवर आहे. यासंदर्भात विचारलेला प्रश्नावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आता नवनीत राणा यांचा अंतर्मन भाजपचा आहे. आधी नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबा निघून आल्या. तेव्हा त्या भगवा, निळा, हिरवा झेंडा घेऊन मिळत होत्या. आता त्या हिंदू शेरनी झाल्या आहेत असे बच्चू कडू म्हणाले. पुढचा खासदार हा अमरावतीमध्ये भाजपचाच असेल असा दावा भाजपकडून केला जात आहे. आणि दुसरीकडे नवनीत राणा यांचा भाजप प्रवेशात चर्चा आहे. त्यामुळे यावरून बच्चू कडू यांनी बोलताना नवनीत राणा यांना भाजपमध्ये घेऊन युवा स्वाभिमान पक्ष भाजपला संपवायचा आहे काय. त्यांचा स्वाभिमान संपायला नको त्यांची काळजी भाजपने द्यायला पाहिजे असे ते म्हणाले. भाजपा किती मोठा पक्ष असला तरी तो आम्हाला (प्रहार ला) संपू शकत नाही त्यांच्याकडे संख्या असली तरी आमच्याकडे गुणवत्ता आहे असेही कडू यांनी स्पष्ट मध्ये मोदींची गॅरंटी लोकसभा निवडणुकीत चालणार का, या प्रश्नाचा उत्तर या दाखल बच्चू कडू यांनी सक्षम विरोधी पक्ष अथवा नेता देशपातळीवर सध्या नसल्याचे सांगितले. काँग्रेस मधील देखील पानदान वाजले असून सगळ्या फांद्या तुटल्या आहेत असे ते म्हणाले. प्रहार चे दहा पंधरा आमदार निवडून आल्यास आणि आमच्या मुख्यमंत्री झाल्यास व्यवस्था बदलू असेही आ. बच्चू कडू म्हणाले.