आशाताई बच्छाव
होट्टल ते देवापूर, येरगी जाणाऱ्या पुलाची दुर्दशा
नांदेड जिल्हा/प्रतिनिधी मनोज बिरादार
देगलूर तालुक्यातील होट्टल ते देवापूर व येरगी गावाला जाणाऱ्या पुलावर अतिृष्टीमुळे पाणी वाहत असल्याने त्या पुलाची संरक्षक भिंत गेल्यावर्षी कोसळली होती तेव्हा 10 ऑगस्ट 2022 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर येथे पत्र देऊन तो संरक्षक कठडा (भिंत) दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती.परंतु अद्याप दुरुस्त करण्यात आले नाही. आणि आजघडीला अतिृष्टीमुळे त्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने देवापूर व येरगी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.तसेच या पाण्यामुळे संपूर्ण पुल कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.तसे झाले तर वरील दोन्ही गावाचा संपर्क तुटेल.
येरगी हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे गाव असल्याने तेथे दररोज विविध राज्यातील अभ्यासक व पर्यटक येत असतात. तसेच देगलूर मुख्यालयी येण्यासाठी या दोन्ही गावांना हाच एकमेव मार्ग असल्याने या पुलाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. या गावातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी होट्टल व देगलूर येथे जात असतात. जर हा पुल कोसळला तर वाहतूक व बससेवा बंद होऊन या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल.
यामुळे या पुलाचे संरक्षक कठडे बांधून त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणीचे निवेदन सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम,तहसीलदार राजाभाऊ कदम,उप कार्यकारी अभियंता वही. डी.गिरी यांना देण्यात आले.निवेदनावर येरगीचे सरपंच तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील,ग्रामसेवक राजेश तोटावाड,तलाठी मोहन कदम व गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.