आशाताई बच्छाव
आज जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या वतीने उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती श्री जि.ए. सानप यांच्या सत्काराचा कार्यक्रम
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- जिल्हयातील रहिवासी व उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती तथा पालक न्यायमुर्ती जि.ए. सानप यांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल वाशिम जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या वतीने शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी स्थानिक काळे लॉन येथे सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जि. ए. सानप साहेब हे वाशिम जिल्हा विधीज्ञ मंडळाचे माजी सदस्य आहेत. सन १९९६ पासुन सानप यांनी मुंबईत न्यायाधिश म्हणुन आपले कर्तव्य बजावायला सुरूवात केली. सन २००८ मध्ये त्यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधिश म्हणुन तसेच सन २०१० मध्ये उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय येथे रजिस्टर म्हनुन चोखरित्या कामकाज पार पाडले आहे. त्यांनी सन २०११ मध्ये मुंबई बॉम्बस्पोट प्रकरण आणि टाडा अंतर्गत इतर प्रकरणे उत्कृष्टरित्या हाताळली आहेत. ९ मार्च २०२३ रोजी श्री. सानप यांना पदोन्नती मिळाली आणि ते मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर येथे न्यायमुर्ती म्हणुन उत्कृष्टरित्या काम करीत आहेत. ते वाशिम जिल्हयाचे रहिवासी व वाशिम जिल्हा विधीज्ञ मंडळाचे माजी सदस्य म्हणुन त्यांनी वाशिम जिल्हयाचे नाव न्यायालयीन क्षेत्रात उज्वल केले आहे, त्यांच्या या उत्कृष्ट कार्याचा सन्मान म्हणुन वाशिम जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या वतीने त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात जिल्हयातील जे विधीज्ञ न्यायालयीन क्षेत्रात न्यायाधिश म्हणुन आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. त्यांचा सुध्दा सन्मान या कार्यक्रमात होणार असल्याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष अॅड. वैभव तिफने यांनी दिली.