आशाताई बच्छाव
रक्षाबंधनासाठी जात असलेल्यांची बोट बुडाली, ३५ जण बेपत्ता बांदा,(उतरप्रदेश युवा मराठा न्युज नेटवर्क)
रक्षाबंधनासाठी जात असलेल्यांची बोट यमुना नदीत पलटी होऊन ३५ जण बेपत्ता झाल्याची घटना उत्तरप्रदेशमधील बांदा येथे ही घडली आहे. बुडालेल्यांपैकी तिघांची मृतदेह हाती लागले असून या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते.
या बोटीमध्ये एकूण ५० लोक प्रवास करत होते. त्यात २० ते २५ महिला व मुलेही होती. या महिला रक्षाबंधनासाठी माहेरी जात होत्या. या बोटीतील ३५ जण बेपत्ता आहेत. त्यातील तीन जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आल्याचे माहिती प्रशासनाने दिले. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.
नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर बोटीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. बोट बुडण्याची धोका दिसल्यानंतर काही प्रवाशांनी नदीत उडी मारली. यामुळे बोटीमध्ये आणखीन गोंधळ उडाला. त्यानंतर ही बोट संपूर्णपणे नदीत बुडाली. तर त्यातील महिला आणि लहान मुले ही बेपत्ता झाली. दोन महिला आणि एक मुलाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. इतरांचा शोध सुरू आहे.