आशाताई बच्छाव
गोर गरीबांची सेवा करण्यातच खरा आनंद दडला आहे – सत्यपाल महाराज —————————————-
संत गाडगेबाबा पुरस्काराचे वितरण @ रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ————————————–
जालना(दिलीप बोंडे)रक्तदान,देहदान,अवयवदान आणि नेत्रदानातच देवाचे देवत्व आहे.देव हा बाजारातला भाजीपाला नाही.रंजल्या,गांजलेले आणि अपंगाची सेवा करून त्यांना अन्नदान करण्यामध्येच खरा आनंद असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध सप्त खंजेरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी येथे बोलतांना केले.
राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या ६७ व्या पुण्यतिथी निमित्त जालना येथील डेबूजी परिवार आणि गुरू शिष्य परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने जुना जालना भागातील महालक्ष्मी मंदिरात बुधवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.यावेळी परिट समाजाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव वाघमारे,प्रदेश उपाध्यक्ष मोहन इंगळे,जिल्हाध्यक्ष किशोर आगळे,डेबूजी व गुरू शिष्य परिवाराचे प्रमुख आदर्श शिक्षक किशोर खंडाळे,वसंतराव राऊत,गणेशराव इंगळे,अनिल खंडाळे,सुभाष घोडके,काशिनाथ मेव्हणकर,कैलास वाघमारे,संतोष शिंदे,रमेश पैठणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलतांना सत्यपाल महाराज महणाले की,गाडगे बाबा निघून गेले याचे दुःख नाही. जो आपल्यासाठी जगतो, ते जगणे नाही ! आणि जो सेवेत मरतो, तो मरत नाही !! अशा शब्दात गाडगे बाबा यांच्या कार्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, रक्तदान,अवयवदान,देहदान,नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असून अशा उपक्रमांना आपण स्वतः नेहमीच प्राधान्य देतो.आपण स्वतःच्या पत्नीचे,आई आणि वडिलांचे देहदान दिल्याचे सांगून ” मंदिरी बसुनी नाक दाबावे, त्यापेक्षा रस्त्यावरचे काटे उचलावे ” असा संदेश गाडगे बाबांनी आम्हाला दिला आहे.गाडगे बाबा यांनी फक्त गाव स्वच्छ केली नाही