सोयाबीन काढणीला पावसाचा खोडा
(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
जाहूर : परिसरात सततच्या मुसळधार पावसाने थैमान घातले असून सोयाबीन काढणीला खोडा घातला आहे शेतात कापून टाकलेल्या सोयाबीन चा अक्षरशः चिखल झाला आहे.तर अनेक शेतकर्यांचा शेताला पर्यायी रस्ता नसल्याने शेतात ढिग मारून ठेवलेले सोयाबीन दररोज भिजत आहे .खरिप हंगामाचे हमखास उत्पन्न देणारे म्हणून सोयाबीन पिकाची परिसरात लागवड मोठ्या प्रमाणात झाली.पिकही बरे होते. पण सत्तरच्या पावसाने उतारा मध्ये घट झाली आंक्टोबर महिन्यात सुरूवात झाली अण पावसाने पुन्हा हजेरी लावली त्यामुळे शेतकरया मध्ये चिंतेच वातावरण पसरले आहे याचेच चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.