आशाताई बच्छाव
नागपुर येथील स्त्री मुक्ती परिषदेला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित असावे — डी जी रंगारी
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) 20 मार्च 1927 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याच्या पाण्याला आग लावून मानव मुक्तीच्या युद्धाची सुरुवात केली त्याच वर्षी 25 डिसेंबर 1927 रोजी स्त्रिया शूद्र व अतिसुंद्रांच्या या गुलामीतला धार्मिक आधार देणाऱ्या मनुस्मृती या विषमतावादी ग्रंथाचे जाहीर दहन केले .भारतीय समाज मनावर याच मनुस्मृतीतील नियम व कायद्याचे अधिराज्य होते त्या मनुस्मृतीला आग लावून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेवर आधारित मनुवादी व्यवस्थेला आव्हान दिले .डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा समाजाला एक संदेश दिला समाज जागृतीच्या अग्नी तुम्ही कधी देता कामा नये याला अनुलक्ष्मी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी प्रत्येक वर्षी 25 डिसेंबरला स्त्रि मुक्ती परिषदेची परंपरा निर्माण केली तसेच 25 डिसेंबर २०२३ ला नागपूर येथील कस्तुरचंदपार्क येथे भव्य मनुस्मृति दहन दिनानिमित्त स्त्री मुक्ती परिषद आयोजित करण्यात आलेली आहे दुपारी 12 वाजता ही महिला परिषद आयोजित असून या परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे सर्व श्रद्धेय ॲड बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार त्याचप्रमाणे माननीय रेखाताई ठाकूर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्ह्यातील जिल्हा संघटक डी .जी .रंगारी यांनी एका प्रसिद्ध पत्रकार केलेले आहे.