आशाताई बच्छाव
महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये असलेल्या
आरोग्य मित्रांना 25 हजारांची वेतनवाढ करा
जिल्हाधिकारी यांच्याकडे आरोग्यमित्रांची मागणी
जालना (दिलीप बोंडे) ः महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत (एमजेपीजेएवाय) सेवेत असलेल्या आरोग्य मित्रांना 25,000 रुपये वेतनवाढ देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यासाठी आरोग्य मित्रांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत मागणी केली आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना येथील सर्व आरोग्यमीत्र सन 2012 पासून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये कार्यरत आहेत. ए. एम. डी. इंडिया इन्शुरन्स कंपनी तृतीय पक्षामार्फत या आरोग्य मीत्रांची नेमनुक करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे हे आरोग्यमित्र कोरोणाच्या महामारीतही आपल्या जीवाची पर्वा न करता आणि कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता त्यांनी त्यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. 2018 पासुन प्रधानमंत्री जण आरोग्य योजना (आयुष्यमान भारत) व महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांचे एकत्रित इ-केवायसीचे कामे सुद्धा हे आरोग्यमित्र करत आहेत. त्याचाही मोबदला त्यांना अजुनपर्यंत मिळाला नसल्याने तो मोबदला तात्काळ देण्यात यावा तसेच प्रति महा किमान 25 हजार रुपये वेतनवाढ देण्यात यावी असेही या निवेदनात म्हटले आहे. तसेच या योजनेचे रुग्ण व रुग्णालय यांना कुठल्याही प्रकारची उपचारादरम्यान अडचण येणार नाही. याची आरोग्यमित्र खात्री देत असल्याचे देखील त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. सदरच्या मागण्या तात्काळ मंजुर करण्यात याव्या अशी देखील ओरड आरोग्यमित्रांकडून करण्यात आली आहे. या निवेदनावर सर्वच आरोग्यमित्रांच्या स्वाक्षर्या आहेत.