आशाताई बच्छाव
ब्राम्हण समाजाच्या रास्त मागण्या सोडविण्यासाठी शासनाने प्राधान्य द्यावे – अशोक पांगारकर —————————————-
ब्राम्हण समाजाच्या उपोषणाला सकल तेली समाजाचा पाठिंबा
—————————————– जालना(दिलीप बोंडे)जालना जिल्ह्यासह राज्यातील ब्राम्हण समाजाच्या मागण्या रास्त असून सदर मागण्या राज्य सरकारने प्राधान्याने मार्गी लावाव्यात अशी आग्रही मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सकल तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष अशोक पांगारकर यांनी केली आहे.
राज्यातील ब्राम्हण समाजाच्या उत्कर्षासाठी परशूराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे या आणि अन्य मागण्यासाठी सकल ब्राम्हण समाज संघर्ष समितीतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात दीपक रणनवरे यांनी दि.२८ नोव्हेंबर पासून जालना शहरातील गांधी चमन येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.त्यांच्या या उपोषणाला अशोक पांगारकर यांच्यासह मोहन अबोल,राजेंद्र वाघमारे,अजय मिसाळ,दत्तात्रय राऊत,प्रकाश राऊत,विश्वनाथ क्षीरसागर,जनार्दन व्यवहारे,संदीप सुरळे,संतोष शिंदे,गणेश लगडे,गणेश आरकर,विनोद भोजराज,विकास बोंदरे,प्रसाद सोनवणे,मंगेश गव्हारे,मनोज डोंगरे,राहुल काळे आदी पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी दुपारी उपोषणस्थळी भेट देवून दीपक रणनवरे यांना सकल तेली समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला.तेली समाजाच्या बैठकीत उपोषणाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगून ब्राम्हण समाज हा आपल्या विविध मागण्यांसाठी मागील अनेक वर्षापासून राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असताना या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.ब्राम्हण समाजाच्या मागण्या रास्त असल्याने राज्यातील सरकारने सदर मागण्या सोडविण्यासाठी प्राधान्याने पाऊल उचलावे अशी मागणी अशोक पांगारकर यांनी केली आहे.