आशाताई बच्छाव
३८ दिवसानंतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगिती.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती.
शासकीय सेवेत समायोजना करण्याचा प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी ५ ऑक्टोंबर २०२३ पासून बेमुदत का बंद आंदोलन सुरू केले होते. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ३८ दिवसानंतर गुरुवारी आपले काम बंद संपाला स्थगिती दिली. परंतु आठ दिवसांमध्ये जर आरोग्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर १४ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर आंदोलन त्री व करून आक्रोश मोर्चाचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे. शासकीय सेवेत समायोजना करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी २५ ऑक्टोंबर २०२३ पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते. अमरावती जिल्ह्यातील जवळपास१३५२ अधिकारी व कर्मचारी या संपामध्ये सहभागी होते. त्यामुळे जिल्ह्याचे आरोग्य यंत्रणा ढासळली होती. यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारे आंदोलन करून शासनाचे आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यंदाची दिवाळी देखील कर्मचाऱ्यांनी संपव मंडपात साजरी केली. तसेच ३१ ऑक्टोंबर ला मुंबई आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनामध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दहा वर्ष सेवा झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना ३० टक्के थेट सेवा समावेशन व ७० टक्के सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवून धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. तसेच २९ नोव्हेंबरला आरोग्यमंत्र्याच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चेनंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद संपायला काही दिवसाची स्थगिती दिली आहे. परंतु जर आरोग्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर मात्र १४ डिसेंबरला अधिवेशन वरती जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहणार असल्याचा विचारा देखील कर्मचाऱ्यांनी दिला आहे.