Home जळगाव सरकारमान्य चोरांमुळे जळगाव भकास!, 5 वर्षात जळगांव चे खासदार उन्मेष पाटील यांना...

सरकारमान्य चोरांमुळे जळगाव भकास!, 5 वर्षात जळगांव चे खासदार उन्मेष पाटील यांना जळगावकरांनी बघितलेच नाही, हे महाभयानक सत्य…

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20231004-WA0012.jpg

सरकारमान्य चोरांमुळे जळगाव भकास!, 5 वर्षात जळगांव चे खासदार उन्मेष पाटील यांना जळगावकरांनी बघितलेच नाही, हे महाभयानक सत्य…

विभागीय संपादक, योगेश पाटील.

जळगांव शहरातील महाराष्ट्र जागृत जनमंच चे शिवरामदादा पाटील यांनी जळगांव शहराच्या नागरिकांसोबत घेऊन मांडली जळगांव शहरात बनलेल्या रस्त्यांची कैफियत.
जळगाव शहरातील रिंग रोड आणि गणेश कॉलनीचा चौक. रस्ता बनवला आणि फक्त चारच महिन्यात रस्ता उखडला. येथे डांबर कमी टाकली, याचे डांबर कोणी चोरले? यांचें कमीशन कोणी खाल्ले?
आमदार सुरेश भोळे जनतेशी खोटे बोलले.२८६कोटी निधी आणला. रस्ते तर कंडेम बनवले. मग निधी गेला कुठे? आमदार भोळेंनी किती कमीशन खाल्ले ? पालकमंत्री गुलाबराव ने किती कमीशन खाल्ले? मुख्यमंत्री शिंदेंना किती कमीशन दिले? जर यांनी कमीशन खाल्ले नसेल तर मग, काय सार्वजनिक बांधकाम चे अभियंता प्रशांत सोनवणे यांनी एकटे कमीशन पचवले असेल काय? सोनवणेंनी कमीशन घेतले नसेल तर काय मक्तेदाराने बेईमानी केली काय? या चारपैकी एकाही माणसाने प्रामाणिकपणे उत्तर दिले नाही.
नागरिकांनो, ही माणसे स्वताला कितीही मोठी म्हणत असतील, यांना पोलीस आणि कोर्ट संरक्षण देत असतील तरीही ही माणसे आपला कराच्या पैशातून निर्माण झालेला निधी चोरतात. हे येथे सिद्ध होत आहे. जळगांवमधील भग्न रस्ते आणि या माणसांची वाढलेली संपत्ती यांचा शोध प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का घेत नाहीत? या कमीशनखोरांवर इडीची कारवाई का करीत नाही. का? कारण, ही माणसे मोदींचे समर्थक आहेत. म्हणून मोदी यांचे संरक्षक बनलेले आहेत. ते फक्त विरोधी पक्षातील चोरांवर इडीची कारवाई करतात. स्वताचे समर्थकांना चोरीची मुभा देतात.
रात्री चोरी झाली तर पोलिस अटक करतात. कोर्ट जेलमधे टाकतात. तर मग,दिवसा चोरी करणाऱ्यांना पोलिस का पकडत नाहीत? कोर्ट यांना जेलमध्ये का टाकत नाहीत? कारण हे सरकारमान्य चोर आहेत. हे नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत. हे एकनाथ शिंदेंचे साथीदार आहेत.
सायकल चोरणाऱ्या चोरांपेक्षा हे रस्ते चोरणारे जास्त खतरनाक बनलेले आहेत. जनतेला राग तर येणारच !

शिवराम पाटील. महाराष्ट्र जागृत मंच, जळगांव.

Previous articleसंग्रामपूर तालुक्यात होऊ द्या चर्चा – शिवसेनेचच्याअभियाना
Next articleगुरांचा गोठा भ्रष्टाचार प्रकरणात संग्रामपूर पंचायत समिती समोर राष्ट्रगीताने सुरुवात झालेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here